नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४ एकर जमीन घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहेत. या प्रकरणांचा सविस्तर अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत केली.


महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, नंदूरबार जिल्ह्यातील मौजे गंगापूर (ता. नवापूर) येथील भूसंपादनात झालेल्या अनियमिततेबाबत सभागृहात दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. १० मार्च २०२६ रोजीच्या निर्गमित शासन निर्णयानुसार, नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय 'एसआयटी' स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात आढळणाऱ्या फौजदारी गुन्ह्यांची आणि प्रशासकीय चुकांची ही समिती सखोल चौकशी करेल.



​ छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ओपन एसआयटी'



​छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्रिजवाडी (गट नं. ३०) मधील ५४ एकर ३१ गुंठे जमिनीच्या गैरव्यवहारासह शहरातील इतर तक्रारींच्या तपासासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक (IG), जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि भूमी अभिलेख उपसंचाल अशा ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. ब्रिजवाडी प्रकरणाचा तपास एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत. तक्रारींसाठी 'ओपन विंडो' ही एक 'ओपन एसआयटी' असून, संभाजीनगरमधील इतर जमीन गैरव्यवहारांबाबत कोणताही नागरिक एक महिन्याच्या आत तक्रार दाखल करू शकेल. या अर्जांची सविस्तर चौकशी करून समिती आपला निष्कर्ष सादर करेल.


​जमीन गैरव्यवहारात कितीही मोठा अधिकारी किंवा व्यक्ती दोषी आढळली, तरी त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई केली जाईल, असेही महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatray Bharne : "बोगस बियाणे ओळखण्यासाठी बियाण्यांची डीएनए फिंगर प्रिंट टेस्ट केली जाणार" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

"बियाण्यांची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी ‘साथी’ पोर्टलचा वापर बंधनकारक : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बियाणे उत्पादक

लक्ष द्या ! लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीख टाकणे अनिवार्य होणार ? नेमकी शिफारस काय ?

लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे , दोन कुटुंबाचे मिलन. पण वयोमर्यादा अपूर्ण असली तरी अनेक लग्न होतात, अर्थात बालविवाह

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी बंधनकारकच; परिवहन मंत्र्यांची ठाम भूमिका; आजच्या बैठकीत काय घडलं ?

(Marathi Language Compulsory Taxi-Auto ) : आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना ₹१५०० येणार की ₹३००० येणार? अपडेट काय ?

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अनेक गरजू

Maharashtra Heat Wave : राज्यभर उष्णतेचा कहर; अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद, पुढील दोन दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

महाराष्ट्रात सध्या उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवत असून राज्यभर तापमानाने अक्षरशः उच्चांक गाठला आहे. मराठवाडा,