कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक


सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मिरजमिरज-लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे.


गुरूवार, 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.गाडी क्रमांक 01443 मिरज-लातूर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरजहून सुटून ती दुपारी 3:30 वाजता लातूरला पोहोचणार आहे. ती गाडी सकाळी 10:15 वाजता पंढरपूरच्या रेल्वेस्थानकावर येईल. गाडी क्रमांक 01444 ही लातूर-मिरज दररोज दुपारी 4:00 वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री 11:45 वाजता मिरजला पोहोचणार आहे.


या गाडीचे सकाळी 7:45 वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल. गाडी क्रमांक 01442 लातूर-मिरज ही दररोज सकाळी 6 वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी 1:50 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01441 मिरज-लातूर दररोज रात्री 10:00 वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल. तीच गाडी पुन्हा रात्री 11:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.


Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय