कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक


सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भाविकांसाठी मध्य रेल्वेच्या येथील विभागीय कार्यालय प्रशासनाने चांगला निर्णय घेतला आहे. पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मिरजमिरज-लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचे घोषित केले आहे.


गुरूवार, 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळात रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.गाडी क्रमांक 01443 मिरज-लातूर 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरजहून सुटून ती दुपारी 3:30 वाजता लातूरला पोहोचणार आहे. ती गाडी सकाळी 10:15 वाजता पंढरपूरच्या रेल्वेस्थानकावर येईल. गाडी क्रमांक 01444 ही लातूर-मिरज दररोज दुपारी 4:00 वाजता लातूरहून सुटून याच दिवशी रात्री 11:45 वाजता मिरजला पोहोचणार आहे.


या गाडीचे सकाळी 7:45 वाजता पंढरपूरच्या स्टेशनवर आगमन होईल. गाडी क्रमांक 01442 लातूर-मिरज ही दररोज सकाळी 6 वाजता लातूरच्या स्थानकावरून सुटून ती दुपारी 1:50 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01441 मिरज-लातूर दररोज रात्री 10:00 वाजता मिरजच्या स्थानकावरून सुटेल व ती दुसऱ्या दिवशी पहाटे 5:30 वाजता लातूरच्या स्थानकावर पोहोचेल. तीच गाडी पुन्हा रात्री 11:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.


Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार