Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीमुळे सध्या तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात सुरक्षा रक्षक (Security Guards) पुरवण्याचे काम करणाऱ्या बीव्हीजी कंपनीकडून (BVG Company) कर्मचाऱ्यांना दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाला'चे पॅकेट देण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि जगभरातील विठ्ठल भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे पवित्र स्थान असून, अशा पवित्र ठिकाणी मांसाहाराशी संबंधित वस्तू दिवाळी भेट म्हणून दिल्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकाराबद्दल बीव्हीजी कंपनीवर आणि मंदिर प्रशासनावर जोरदार टीका होत आहे.



पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवरून वाद


पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे वारकरी संप्रदायाचे केंद्रस्थान मानले जाते. या ठिकाणी दरवर्षी लाखो वारकरी 'माऊली माऊली'चा गजर करत पायी वारी करतात. वारकरी परंपरेनुसार शाकाहार, संयम आणि साधेपणा ही जीवनशैली अत्यंत महत्त्वाची आहे. या परंपरेत मांसाहार, मद्यपान किंवा त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना थारा नसतो. अशा पवित्र ठिकाणी मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेटवस्तू म्हणून 'चिकन मसाल्या'सारख्या वस्तूंचे वाटप झाल्यामुळे अनेक भक्तांमध्ये आणि वारकरी संप्रदायात तीव्र भावनिक रोष (Emotional Outrage) व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी कंपनी (BVG Company) ही मंदिरात सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर काही सेवा आऊटसोर्सिंग पद्धतीने पुरवते. दिवाळीच्या निमित्ताने या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून इतर उत्पादनांसोबतच भेट पिशवीत चिकन मसाल्याचे पाकीट देण्यात आले. याच कारणामुळे आता वारकरी संप्रदायातून या भेटवस्तूबाबत मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे.



बीव्हीजी ग्रुपकडून नियमांचे उल्लंघन?


पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला सुरक्षा रक्षक पुरवण्याच्या कामाचा ठेका मिळालेल्या बीव्हीजी ग्रुप बद्दलची माहिती सध्या चर्चेत आहे. या ग्रुपला तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांचा हा महत्त्वाचा ठेका मिळाला आहे. मे महिन्यापासून विठ्ठल मंदिरात सुरक्षारक्षक पुरवण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या ठेकेदाराकडून मंदिराचे नियम पाळले जात नसल्यामुळे त्याचा ठेका रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मंदिराने निविदा (Tenders) प्रसिद्ध केल्यावर देशभरातून आठ एजन्सींनी यासाठी दर (Rates) दिले होते. या आठही एजन्सीने सर्व्हिस चार्जेस म्हणून ३.८५% इतका समान दर कोट केल्याची माहिती आहे बीव्हीजी कंपनी मंदिरासाठी जवळपास २२० सुरक्षारक्षक पुरवणार आहे. या कर्मचाऱ्यांचा वापर मंदिर दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरातील परिवार देवतांच्या ठिकाणी केला जाणार आहे. याशिवाय, यात्रेसाठी लागणाऱ्या जास्तीच्या सुरक्षारक्षकांची जबाबदारीही बीव्हीजीवर असणार आहे. मंदिर आणि परिसरात सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या बीव्हीजीसाठी मंदिर समितीची नियमावली असून, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी बीव्हीजी ग्रुपवर असणार आहे.

Comments
Add Comment

Sheetal Tejwani Arrested : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यात मोठी कारवाई; प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक!

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत या प्रकरणातील प्रमुख

Sadanand Date : सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक? महाराष्ट्र सरकारने पाठवला केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई : राज्याच्या विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून,

Devendra Fadanvis : 'राजकीय पर्यावरणवाद्यां'कडून कुंभमेळ्याच्या आयोजनात खोडा घालण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा थेट आरोप!

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता भव्यदिव्य आयोजन करणार मुंबई : “नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनात अडथळे

Assembly Winter Session 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित! किती दिवस चालणार अधिवेशन?

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले नागपूर (Nagpur) येथील हिवाळी अधिवेशन (Winter Session) अखेर किती दिवस चालणार,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन

आधी उड्डाणपूल अन् आता मेट्रो, सिंहगड रस्त्यावर पुणेकरांचा पुन्हा होणार खोळंबा!

पुणे: सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपूर्वी ११८ कोटी रुपये खर्च करून