नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी अचानक धाड टाकली. यादरम्यान केलेल्या झाडाझडतीमध्ये एका अधिकाऱ्याच्या टेबलमधून लपवून ठेवलेली रोकड हस्तगत करण्यात आली, ज्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.


नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींमध्ये नोंदणी प्रक्रियेसाठी पाच ते आठ हजार रुपयांची लाच मागितली जात असल्याचे सांगण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान मंत्री बावनकुळे यांनी कार्यालयातील विविध फायली तपासल्या आणि प्रक्रियेमध्ये होत असलेला गैरप्रकार उघडकीस आणला.


?si=UDi53zfHqm_WRJJs

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, "डिजिटल यंत्रणा असतानाही लाचखोरी सुरू असल्याचे दिसत आहे. हे अत्यंत गंभीर असून यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणीही सामान्य नागरिकांना त्रास देत असेल, तर त्याला पाठीशी घातले जाणार नाही."


छाप्याच्या वेळी उपस्थित पोलिसांना त्यांनी लगेचच तपास सुरू करण्याचे निर्देश दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.


दरम्यान, महसूल विभागात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने अलीकडेच अनेक डिजिटल सुविधा लागू केल्या आहेत, जसे की ई-स्टॅम्पिंग, ई-बॉन्ड, ई-सिग्नेचर आणि ऑनलाइन पेमेंट. महाराष्ट्र हे या सुविधांची अंमलबजावणी करणारे देशातील १७वे राज्य ठरले आहे.


या डिजिटल सुधारणांमुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळण्यास मदत होईल, तसेच भ्रष्टाचार रोखण्यास मोठा हातभार लागेल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय