काका शरद पवारांपासून वेगळं का झालो? अजितदादांनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

नागपूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'चिंतन शिबिर'चे उद्घाटन केले. अधिवेशनात पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांना संबोधित करताना त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरुद्ध बंड का केले याबाबत पहिल्यांदाच मोठा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात  स्थिरता आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी काका शरद पवार यांच्या पक्षापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितले की, मित्र पक्षांमधील परस्पर आदर आणि राज्याच्या प्रगतीसाठीच्या  वचनबद्धतेमुळे त्यांचा पक्ष महायुती आघाडीचा भाग आहे. अजित पवार पुढे म्हणाले की, "चिंतन शिबिर" केवळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती तयार करण्यावरच नव्हे तर भावी पिढीवरही लक्ष केंद्रित करेल. या कार्यक्रमादरम्यान विचारविनिमय आणि चर्चा केल्यानंतर, "नागपूर घोषणापत्र" म्हणून एक मसुदा तयार करून तो प्रकाशित केला जाईल असे देखील अजित पवार म्हणाले.

भाजप आणि शिवसेनेशी युतीबद्दल खुलासा


अजित पवार यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि शिवसेनेसोबत युतीत आहे, आणि बरेच लोक त्यांना विचारतात की त्यांनी हे पाऊल का उचलले? तसेच कौटुंबिक आणि वैयक्तिक संघर्ष निर्माण करणारा हा मार्ग त्यांनी स्वीकारला? त्यावर अजित पवार पुढे म्हणाले की, "मी हे सत्तेसाठी किंवा पदासाठी नाही तर महाराष्ट्रात स्थिरता आणि प्रगती सुनिश्चित करण्यासाठी केले आहे."

अजित पवार पुढे म्हणतात की,  "मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांच्या नेतृत्वाखाली देशाला स्थिरता मिळाली आहे आणि त्यांनी नेहमीच महाराष्ट्रासाठी मोठे मन दाखवले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या मागण्या नेहमीच मान्य केल्या आहेत."
Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय