कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद


मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. दरम्यान, आज अंबाबाईचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. यामुळे दिवसभर गाभाऱ्याचा दरवाजा बंद राहील. यामुळे भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.


सकाळी साडे आठ वाजल्यापासून आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीकडून गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. वॉटर जेट मशिनच्या मदतीने ही स्वच्छता केली जाईल. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही स्वच्छता पूर्ण होईल. ही स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आधीसारखे सुरू होईल अशी माहिती देवस्थानाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, महासरस्वती मंदिरात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीपूजक मंडळाने दिली आहे.
Comments
Add Comment

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट