कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद


मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध तीर्थस्थळांपैकी एक आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात. दरम्यान, आज अंबाबाईचे मंदिर दिवसभर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.


शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवशी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. यामुळे दिवसभर गाभाऱ्याचा दरवाजा बंद राहील. यामुळे भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही.


सकाळी साडे आठ वाजल्यापासून आय स्मार्ट फॅसिटेक कंपनीकडून गाभाऱ्याची स्वच्छता केली जाईल. वॉटर जेट मशिनच्या मदतीने ही स्वच्छता केली जाईल. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ही स्वच्छता पूर्ण होईल. ही स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन आधीसारखे सुरू होईल अशी माहिती देवस्थानाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, महासरस्वती मंदिरात अंबाबाईच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेण्याची सोय भाविकांसाठी करण्यात आली आहे. अशी माहिती श्रीपूजक मंडळाने दिली आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे