वर्धा : वीज कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

विदर्भात मुसळधार पाऊस सुरु असून वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करत असताना शेतात आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर दुपारी १.३० वीज कोसळल्याने वृषभ कोटगले वय २२ या तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.

वृषभ कोटगले याने शनिवारी स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर यांना सोबत घेऊन शेतात फवारणी केली.

शेतामध्ये काम करत असताना पावसाने हजेरी लावली. यावेळी स्वप्नील, संजय आणि विष्णू या तिघांनी एका झाडाखाली आसरा घेतला तर वृषभ हा जवळच्याच दुसर्‍या झाडाखाली आडोशाला थांबला. यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असतानाच वृषभ उभा असलेल्या झाडावर वीज कोसळली आणि यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर हे जखमी झाले. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
वृषभ कोटगले हा कुटुंबाचा एकमेव आधार होता.

वृषभच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृषभच्या खांद्यावर शेती आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चात बहीण, आई आणि आजी-आजोबा असा परिवार आहे.
Comments
Add Comment

मराठमोळा शिव ठाकरे ठरला 'द ५० इंडिया' शोचा विजेता

मुंबई: मराठी अभिनेता शिव ठाकरे याने 'द ५० इंडिया' शोच्या विजेतेपदाचा मान मिळवला आहे. त्याने 'द ५० इंडिया' ट्रॉफी आणि

Kalyan: नागरिकांच्या घरांवर फेकले सुतळी बॉम्ब; कल्याणमधील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

मुंबई: कल्याण जवळील आंबिवली परिसरात नशेखोराकडून नागरिकांच्या घरांवर सुतळी बॉम्ब फेकल्याची घटना नुकतीच घडली

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड