वर्धा : वीज कोसळून एकाचा मृत्यू, सात जण जखमी

विदर्भात मुसळधार पाऊस सुरु असून वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करत असताना शेतात आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर दुपारी १.३० वीज कोसळल्याने वृषभ कोटगले वय २२ या तरुणाचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.

वृषभ कोटगले याने शनिवारी स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर यांना सोबत घेऊन शेतात फवारणी केली.

शेतामध्ये काम करत असताना पावसाने हजेरी लावली. यावेळी स्वप्नील, संजय आणि विष्णू या तिघांनी एका झाडाखाली आसरा घेतला तर वृषभ हा जवळच्याच दुसर्‍या झाडाखाली आडोशाला थांबला. यावेळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू असतानाच वृषभ उभा असलेल्या झाडावर वीज कोसळली आणि यात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान स्वप्नील कोडापे, संजय गोळे आणि विष्णू भोयर हे जखमी झाले. पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
वृषभ कोटगले हा कुटुंबाचा एकमेव आधार होता.

वृषभच्या वडिलांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृषभच्या खांद्यावर शेती आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असताना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पश्चात बहीण, आई आणि आजी-आजोबा असा परिवार आहे.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात