अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. जर अमेरिकेला भारताचे महत्त्व समजत नसेल आणि त्यांना भारताची गरज वाटत नसेल तर भारतालाही अमेरिकेची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या अवास्तव टॅरिफ लागू करण्याच्या धोरणाला भारत जशास तसे असे उत्तर देऊ शकतो. भारत पण अमेरिकेवर ५० टक्के टॅरिफ लावू शकतो; असे शशी थरुर म्हणाले.

सध्या भारतात अमेरिकेतून येणाऱ्या अनेक वस्तूंवर साधारण १७ टक्क्यांपर्यंत टॅरिफ अर्थात कर लागू होतो. भारत अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ वाढवू शकतो. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर त्या वस्तू अमेरिकेत महाग होईल. याच पद्धतीने भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर अमेरिकेच्या वस्तू भारतात महाग होतील. वाढलेल्या किंमतीमुळे संबंधित मालाल देशांतर्गत बाजारात असलेली मागणी कमी होईल, असे शशी थरुर म्हणाले.

भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार ९० अब्ज डॉलरचा आहे. भारत ज्या वस्तू निर्यात करतो त्यातील अनेक वस्तूंसाठी पर्यायी बाजार शोधायला थोडा वेळ लागेल. पण हे शक्य आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाच्या राजकारणाला बळी न पडण्याचा आणि ठामपणे उभे राहण्याचा भारत सरकारचा निर्णय योग्य आहे. अमेरिका टॅरिफ धोरणाच्या निमित्ताने दबावाचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे शशी थरुर म्हणाले. त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे वर्णन दादागिरी आणि अन्याय्यकारक असे केले आहे.
Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा