अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर संतापले शशी थरुर, मोदींना सुचवला रामबाण उपाय

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी जाहीरपणे संताप व्यक्त केला. जर अमेरिकेला भारताचे महत्त्व समजत नसेल आणि त्यांना भारताची गरज वाटत नसेल तर भारतालाही अमेरिकेची आवश्यकता नाही. अमेरिकेच्या अवास्तव टॅरिफ लागू करण्याच्या धोरणाला भारत जशास तसे असे उत्तर देऊ शकतो. भारत पण अमेरिकेवर ५० टक्के टॅरिफ लावू शकतो; असे शशी थरुर म्हणाले.

सध्या भारतात अमेरिकेतून येणाऱ्या अनेक वस्तूंवर साधारण १७ टक्क्यांपर्यंत टॅरिफ अर्थात कर लागू होतो. भारत अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ वाढवू शकतो. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर त्या वस्तू अमेरिकेत महाग होईल. याच पद्धतीने भारताने अमेरिकेच्या वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर अमेरिकेच्या वस्तू भारतात महाग होतील. वाढलेल्या किंमतीमुळे संबंधित मालाल देशांतर्गत बाजारात असलेली मागणी कमी होईल, असे शशी थरुर म्हणाले.

भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार ९० अब्ज डॉलरचा आहे. भारत ज्या वस्तू निर्यात करतो त्यातील अनेक वस्तूंसाठी पर्यायी बाजार शोधायला थोडा वेळ लागेल. पण हे शक्य आहे. त्यामुळे अमेरिकेच्या दबावाच्या राजकारणाला बळी न पडण्याचा आणि ठामपणे उभे राहण्याचा भारत सरकारचा निर्णय योग्य आहे. अमेरिका टॅरिफ धोरणाच्या निमित्ताने दबावाचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे, असे शशी थरुर म्हणाले. त्यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचे वर्णन दादागिरी आणि अन्याय्यकारक असे केले आहे.
Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे