Vande Bharat : कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी खुशखबर! कोल्हापूर-मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत ट्रेन धावणार!

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या १५ दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.



सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस धावते. हीच ट्रेन पुण्यापर्यंत धावत असल्याने व्यापारी, प्रवासी, नोकरदार वर्गाची ती मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी होत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सोडण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच ती सकाळी मुंबईला सोडण्यात यावी, असेही सांगितले. बियाणी म्हणाले, 'टर्मिनसवरून नवीन वंदे भारत थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.


खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. लवकरच गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.' त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत सध्या धावत आहे. तिचे उद्‌घाटन १६ सप्टेंबर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. ती सोमवार, गुरुवार व शनिवार अशी तीन दिवस धावते. ती मिनी वंदे भारत २.० प्रकारातील असून, तिला एकूण ८ डबे असून तिची प्रवासी क्षमता ५५० इतकी असणार आहे. त्यात एसी चेअर कार व एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार या दोन प्रकारांच्या डब्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह