Pandharpur : वारकर्‍यांना सुलभ दर्शनासाठी तुळशीपूजा बंद! वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत ६ ते ७ तास ताटकळत उभे राहावे लागले होते. यामुळे भाविकांनी मंदिर समिती विरोधात नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली होती. तसेच वारकरी संप्रदायाने भाविकांच्या दर्शनात अडथळा आणणारी तुळशीपूजा बंद करण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने प्रक्षाळपुजेपर्यंत ८० तुळशी पूजा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळणार आहे.




भाविकांची नाराजी


श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून येणार्‍या भाविकांना सुविधा चांगल्या देण्यात याव्यात. यासाठी शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची स्थापना केली आहे. मात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती भाविकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. व्हिआयपी दर्शन, तुळशीपूजेला दर्शन बंद, यामुळे भाविकांना दर्शन रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे जलद दर्शन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.




केवळ १० तुळशीपूजा सुरु राहणार


मागील चार दिवसापुर्वी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ६ ते ७ तास दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे भाविकातून तीव्र संताप व्यक्त घोषणाबाजी करण्यात आली. तुळशी पूजेमुळे भाविकांना दर्शन रांगेत जास्त वेळ उभे राहावे लागले. म्हणून मंदिर समितीने विठ्ठलाची तुळशीपूजा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज विठ्ठलाच्या ९० तुळशी पूजा होत होत्या. आता ८० पूजा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ १० तुळशीपूजा सुरु राहणार आहेत. वारकर्‍यांची गर्दी वाढली, गरज भासली तर त्या १० तुळशीपूजा देखील बंद करुन जास्तीत जास्त वारकर्‍यांना दर्शन देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले.



भाविकांच्या गर्दीत होणार वाढ


दरम्यान, पुढच्या महिन्यात आषाढी यात्रा आहे. या निमित्ताने लाखो भाविक दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असतात. शिवाय पायी दिंड्या देखील पंढरपूरमध्ये येत असतात. यामुळे भाविकांच्या आता किमान पुढील २ महिने भाविकांची गर्दी अधिक राहणार आहे. या अनुषंगाने आलेल्या भाविकांना लवकर दर्शन घेता यावे; यासाठी नित्य तुळशी पूजा बंद करण्याची मागणी होत आहे. यावर आता मंदिर समिती काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह