उल्हास नदीच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुराख्यांना मिळाले जीवनदान

कल्याण :कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदी वाहते. यावेळी पावसामुळे उल्हास नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि मोहिली ते गाळेगाव दरम्यान उल्हासनदी पात्रात असलेल्या बेट सदृश्य भागात तीन गुराखी अडकले. उल्हासनदीची पुराच्या पाण्याची वाढती पातळी आणि जीव धोक्यात आल्याने सावल्या वाघे वय ६५, शंकर पाटील वय ५५, देव गायकर वय ६० सर्व राहणारे मोहाली यांची या प्रसंगातून सुटका कशी होणार यासाठी प्रशासन ‘अ’ प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, आप्तकालीन यंत्रणा, कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, महसूल विभाग कर्मचारी कल्याण तालुका यांनी बचाव कार्य सुरू केले.



गाळेगाव येथील स्थानिक कोळीबांधव गुरूनाथ पवार, रोहन पवार यांनी उल्हासनदी पात्राच्या पुराच्या पाण्यात धारेवर कुशलरित्या आणि अनुभवीपणे होडी चालवीत बेटापर्यंत जात तीनही गुरख्यांची सुखरूप सुटका करीत सुरक्षित रित्या नदी किनारी आणलेले पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.


गुरनाथ पवार, रोहन पवार यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडचे आहे. देवदुत बनत दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचविणे मोठे धाडसाचे देवदुतासारखे काम त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी तातडीने गुरूनाथ पवार, रोहन पवार यांच्या कामांची दखल घेत कल्याण तहसीलदार कार्यालयात रोख बक्षीस देत सत्कार, केला आणि त्यांच्या प्ररेणादायी, धाडसी कामाचे
कौतुक केले.

Comments
Add Comment

सर्पदंश झालेल्या मावशीचाही उपचारादरम्यान मृत्यू!

मृतांच्या नातेवाइकांचे मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन कल्याण (वार्ताहर) : साडेचार वर्षांच्या

बदलापूरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपले

बदलापूर : अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई सोमवारी पश्चिम

उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून मुलाचा मृत्यू

डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २८ तारखेला रात्री आठ

एका जाडजूड बॅगेने घेतला रेल्वे प्रवाशांचा जीव, मुंब्रा अपघात प्रकरणी हाती आली नवी माहिती

मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन

डोंबिवलीत प्रियकराने केली आत्महत्या, पण नेमकं कारण काय? खरंच प्रेयसीसोबत वाद झाला होता का?

प्रेमसंबंधातील वाद की काहीतरी वेगळं? डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील राहुलनगर परिसरात शनिवारी दुपारी घडलेल्या

ठाणे हायस्पीड रेल्वे स्टेशन होणार देशातील पहिले मल्टीमोडल इंटीग्रेटेड स्टेशन

आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ठाणे : ठाण्यात सर्व वाहतूक सुविधांचे जंक्शन तयार होणार आहे. शहराचे आमूलाग्र