उल्हास नदीच्या पाण्यात अडकलेल्या तीन गुराख्यांना मिळाले जीवनदान

कल्याण :कल्याण तालुक्यातील मोहिली गावाजवळ उल्हास नदी वाहते. यावेळी पावसामुळे उल्हास नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि मोहिली ते गाळेगाव दरम्यान उल्हासनदी पात्रात असलेल्या बेट सदृश्य भागात तीन गुराखी अडकले. उल्हासनदीची पुराच्या पाण्याची वाढती पातळी आणि जीव धोक्यात आल्याने सावल्या वाघे वय ६५, शंकर पाटील वय ५५, देव गायकर वय ६० सर्व राहणारे मोहाली यांची या प्रसंगातून सुटका कशी होणार यासाठी प्रशासन ‘अ’ प्रभागक्षेत्र सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील, आप्तकालीन यंत्रणा, कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, महसूल विभाग कर्मचारी कल्याण तालुका यांनी बचाव कार्य सुरू केले.



गाळेगाव येथील स्थानिक कोळीबांधव गुरूनाथ पवार, रोहन पवार यांनी उल्हासनदी पात्राच्या पुराच्या पाण्यात धारेवर कुशलरित्या आणि अनुभवीपणे होडी चालवीत बेटापर्यंत जात तीनही गुरख्यांची सुखरूप सुटका करीत सुरक्षित रित्या नदी किनारी आणलेले पाहता उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला.


गुरनाथ पवार, रोहन पवार यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडचे आहे. देवदुत बनत दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून इतरांचा जीव वाचविणे मोठे धाडसाचे देवदुतासारखे काम त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसत आहे. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी तातडीने गुरूनाथ पवार, रोहन पवार यांच्या कामांची दखल घेत कल्याण तहसीलदार कार्यालयात रोख बक्षीस देत सत्कार, केला आणि त्यांच्या प्ररेणादायी, धाडसी कामाचे
कौतुक केले.

Comments
Add Comment

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या

Nitesh Rane : ठाण्यातील 'मालवणी महोत्सवा'त मंत्री नितेश राणे यांची हजेरी; स्टॉलला भेट देऊन ग्राहकांशी साधला संवाद

ठाणे : ठाणे शहरात सध्या मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 'मालवणी महोत्सवा'ला मंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती

Eknath Shinde : ठाणेकरांनो, आता ट्रॅफिकमध्ये अडकणं विसरा! घोडबंदर रोडच्या रस्ता रुंदीकरणासाठी DCM शिंदेंचा अल्टिमेटम

मुंबई आणि महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) आपला यंदाचा

डोंबिवलीत बंद फ्लॅटवर चोरट्यांची नजर; लाखो रुपयांचा ऐवज गायब

डोंबिवली : शहरात अलीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. भरवस्तीतील बंद घरांवर लक्ष ठेवून

Thane Belapur Traffic Jam : कळवा-ऐरोली 'चक्काजाम'! ठाणे-बेलापूर पट्ट्यात मोठी वाहतूक कोंडी, ऑफिसला जाणाऱ्यांना बसतोय 'लेटमार्क'

ठाणे : आज सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका भीषण