पावसाळा महापालिकेच्या पथ्यावर पडणार

असाच पावसाळा राहिल्यास राखीव कोट्यातील पाणी उचलण्याची येणार नाही वेळ


मुंबई :मुंबईकरांना पुरवठा होणाऱ्या जलसाठ्यांमध्ये सध्या केवळ १५.७५ टक्के एवढाच पाणी साठा शिल्लक असला तरी यंदा महापालिकेने पाणीकपात न करता मुंबईकरांना दैनंदिन पाणीपुरवठा १०० दशलक्ष लिटरने वाढवून दिला आहे. मात्र, पावसाने जर यंदा लावलेली हजेरी पुढे अशीच कायम ठेवल्यास मुंबईकरांना दिल्या जाणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे यंदाची पावसाची हजेरी ही महापालिकेचा पाण्यासाठी होणारा संभाव्य खर्च टाळणारी ठरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरण तथा तलावांमधून दैनंदिन ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. सध्या यासर्व धरण तथा तलावांमध्ये वर्षभराच्या एकूण १४ लाख ४७ हजर ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत सध्या २५ मे २०२५ पर्यंत १५.७५ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध आहे, तर मागील वर्षी याच तारखेला सुमारे ९.६९ टक्के एवढा पाणी साठा उपलब्ध होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साठा अधिक असला तरी पाण्याची वाढती मागणीचा विचार करता भविष्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पाणीकपात करावी लागू नये यासाठी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्या मागणीनुसार, भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव जलसाठ्यातून महापालिकेला पाणी उपलब्ध करून देण्यास जलसंपदा विभागाने मान्यता दिली आहे.


त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पुरेसा पाणी साठा आणि भविष्यात राखीव कोटा लक्षात घेता १०० ते १२५ दशलक्ष लिटर पाणी साठा वाढवण्यात आला. या सर्व धरणातील पाणी साठा ८ टक्क्यांवर येताच राखीव कोट्यातील पाणी उचलण्यात येईल. राखीव कोट्यातून उर्ध्व वैतरणा धरणातून ६५ लाख क्युसेस आणि भातसातून १ लाख ११ हजार क्युसेस पाणी उचलले जाईल. मात्र, हे पाणी गरजेनुसार उचलले जाईल.


जर पाऊस आल्यास येथील पाणी उचलले जाणार नाही. कारण शासनाच्या धरणातून उचलल्या जाणाऱ्या महापालिकेला पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार राखीव कोट्यातील पाणी उचलले जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा पावसाने ज्याप्रकारे हजेरी लावली आहे, तीच जर पुढील काही दिवस कायम राहिल्यास मुंबईला पाणीपुरवठा करताना तलावातील वाढणाऱ्या पाणी साठ्यामुळे राखीव पाणी साठ्यातील उर्ध्व वैतरणा आणि भातसामधून पाणी उचलण्याची गरज भासणार नाही आणि ते पाणी उचलल्यास यासाठी मोजले जाणारे पैसे सरकारला अदा करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे संभाव्य खर्च टाळता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या तलाव क्षेत्रात पाऊस दिसून येत नाही. पण पुढे पावसाळा कसा असेल याची खात्री नाही, पण साडेआठ टक्क्यापर्यंत साठा गेल्यास उर्ध्व वैतरणा आणि भातसाच्या राखीव साठ्यातून पाणी उचलावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.



सर्व तलाव क्षेत्रातील पाणी साठा
२५ मे २०२५ : २ लाख २७ हजार ९९५ दशलक्ष लिटर (१५.७७ टक्के)
२५ मे २०२४ : १ लाख ४० हजार २२० दशलक्ष लिटर (०९.६९ टक्के)
२५ मे २०२३ : २ लाख १८ हजार ५१० दशलक्ष लिटर (१५.१० टक्के)

Comments
Add Comment

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Chandrashekar Bawankule : देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याच्या प्रारूपाला स्थगिती

 हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई :

Weekly Public Transport Day in BKC : बीकेसीमध्ये दर शुक्रवारी पाळणार ‘साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन’

- इंधन बचतीसाठी निर्णय; २ लाख कर्मचारी करणार सार्वजनिक प्रवासी वाहनांचा वापर मुंबई : जागतिक इंधन तुटवड्याच्या

Mumbai News : मुंबईत १५ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्य? सात बांगलादेशी नागरिक अटकेत, पोलिसांचा तपास सुरू

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अवैध स्थलांतराविरोधात मोठी कारवाई करत सात बांगलादेशी (Bangladeshi) नागरिकांना अटक केली

Nalasopara Murder Case : धक्कादायक! ५ महिन्यांपासून बेपत्ता गँगस्टरचा अखेर उलगडा; ड्रेनेज चेंबरमधून सापडला मानवी सांगाडा

नालासोपारा :  गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या कुख्यात गँगस्टर रवि बिडलान (Ravi Bidlan Murder Case) प्रकरणात मोठा

Municipal Schools : महापालिका शाळांमधील मुलांसाठी वह्या, स्टेशनरी आणि गणवेश खरेदीला मान्यता

शालेय साहित्य खरेदीला विलंब, मुलांना मिळणार उशिराने मुंबई : मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना देण्यात