Breaking News : पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंदी नंतर सरकारचा 'बीबीसीला' इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर आता सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे. हे प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून सरकारकडून दक्षता घेण्यात येत आहे.


सरकारने म्हणलं आहे की, बीबीसीसह सर्व विदेशी वाहिन्यांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांना भारतात प्रसारण करण्याचा त्यांचा परवाना हा त्यांना दिलेला एक विशेषाधिकार आहे. मात्र हा अधिकार मिळाला असला तरी देखील देशातील नियम आणि कायदे पाळणे त्यांना बंधनकारक आहे. मात्र तरी देखील तुम्ही तुमचे पुर्वग्रह देशात पसरवत असाल तर तुम्हाला भारतात प्रसारण करण्याचा तुमचा अधिकार नाकारण्यात येऊ शकतो.



केंद्र सरकारकडून ६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केल्यानंतर सरकारने बीबीसीला देखील इशारा दिला आहे. कारण बीबीसीकडून पहलगाम दुर्घटनेनंतर प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये बीबीसीने भारतीयांचे व्हिसा पाकिस्ताने निलंबित केले असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी दहशतवाद्यांना दहशतवादी नाही तर उग्रवादी म्हटलं आहे. मात्र हे उग्रवादी नसून दहशतवादीच होते. जे पाकिस्तानमधून आल्याचं देखील सांगितलं जात आहे. देशभर संतापाची लाट उसळली आहे. त्यात बीबीसीने मात्र वेगळी भूमिका घेतल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.





दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री पसरवल्याबद्दल एकूण ६.३ कोटी सबस्क्राइबर असलेल्या सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च