१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

  150

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन जणांना ५ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. या प्रकरणात विजया बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक दामोधर कामत, माधव एंटरप्रायझेसचे मालक निखिल पट आणि एजंट सुरज तायडे दोषी ठरले.


या घोटाळ्याची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. कामत यांनी बनावट LC जारी केल्यावर बँक ऑफ इंडिया (BOI)च्या विलेपार्ले शाखेकडून १० कोटी रुपये मंजूर झाले. पाचवे LC देताना संशय आल्याने चौकशी झाली आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला.



विशेष न्यायाधीश ए. व्ही. खरकर यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात कामत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवत १५ लाख दंड ठोठावला. निखिल पट यांना ८ कोटींचा दंड आणि सुरज तायडे यांना ३० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे.


या प्रकरणात एक आरोपी मृत असून दोन फरार आहेत. सात आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.


दरम्यान, देशाच्या आर्थिक रचनेवर घात करणाऱ्या पांढरपेशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे कठोर शिक्षा देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने नमूद केले.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत