१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन जणांना ५ वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. या प्रकरणात विजया बँकेचे तत्कालीन वरिष्ठ व्यवस्थापक दामोधर कामत, माधव एंटरप्रायझेसचे मालक निखिल पट आणि एजंट सुरज तायडे दोषी ठरले.


या घोटाळ्याची सुरुवात २०१२ मध्ये झाली होती. कामत यांनी बनावट LC जारी केल्यावर बँक ऑफ इंडिया (BOI)च्या विलेपार्ले शाखेकडून १० कोटी रुपये मंजूर झाले. पाचवे LC देताना संशय आल्याने चौकशी झाली आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला.



विशेष न्यायाधीश ए. व्ही. खरकर यांनी १७ एप्रिल रोजी दिलेल्या निकालात कामत यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी ठरवत १५ लाख दंड ठोठावला. निखिल पट यांना ८ कोटींचा दंड आणि सुरज तायडे यांना ३० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे.


या प्रकरणात एक आरोपी मृत असून दोन फरार आहेत. सात आरोपींपैकी एका आरोपीची निर्दोष मुक्तता झाली.


दरम्यान, देशाच्या आर्थिक रचनेवर घात करणाऱ्या पांढरपेशा गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे कठोर शिक्षा देणे आवश्यक होते, असे न्यायालयाने नमूद केले.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०