Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली...

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ


मुंबई : काही अपघात हे केवळ चुकून होत नाहीत, ते अमानुषतेच्या सीमाही ओलांडतात. गाडीने उडवलं, तरी का थांबवलं नाही? एक महिला, ४५ वर्षांची, गाडीखाली येऊन १.५ किमी फरफटत गेली... तरीही चालक फरार का झाला? काय माणुसकी इतकी स्वस्त झालीय का? Mumbai BMW hit and run case या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने जामिन फेटाळताना ताशेरे ओढले आणि आरोपी मिहीर राजेश शहा याच्या जामिनाला नकार दिला. “हे प्रकरण सर्वात क्रूर घटनांपैकी एक आहे,” असे स्पष्ट मत न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.


७ जुलै २०२४. वरळीच्या अ‍ॅनी बेझंट रोडवर एका BMW कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवर प्रदीप आणि त्याची पत्नी कावेरी होते. प्रदीप कडेला फेकला गेला... पण कावेरी? ती गाडीच्या समोरच्या चाकात अडकली आणि ड्रायव्हरने गाडी थांबवण्याऐवजी तीला चक्क १.५ किलोमीटर फरफटत नेलं!



ही BMW चालवत होता मिहीर राजेश शहा. मिहीर हा शिवसेना नेत्याचा मुलगा. अपघातानंतर मिहीर फरार झाला. पण लोक संतापले होते. त्यामुळे प्रचंड दबावानंतर दोन दिवसांनी त्याला पालघरमधून अटक केले.


पण मिहीर शहाचे वकील म्हणाले, “अटक करण्याआधी पोलिसांनी कारणं देणं बंधनकारक आहे.” यावर न्यायालयाने संतापून थेट विचारले की, कोणीतरी रस्त्यावर गोळ्या झाडत असेल, तर पोलिसांनी आधी अटक करावी की आधी कारणं लिहीत बसावं? कायद्याच्या अंमलबजावणीवर अशा मागण्यांचा गैरवापर होत असल्याचा स्पष्ट इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला.


दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानेही २५ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, “मानवतेच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या आणि अमानुष कृत्य करणाऱ्या या घटनेत आरोपींना माफ करता येणार नाही.”




Comments
Add Comment

Additional Municipal Commissioner : एसआयआरच्या कार्यक्रमासाठी रुजू न झालेल्या बीएलओंविरोधात पोलिसांत दाखल करणार गुन्हा

महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले स्पष्ट निर्देश मुंबई: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार

Agriculture Minister Dattatray Bharne : कृषी मित्र भरतीच्या नावाखालील बोगस जाहिरातींपासून सावध राहा; फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

कृषी मित्र भरतीच्या नावाखालील फसवणुकीला बळी पडू नका; शेतकरी व युवकांना कृषी मंत्र्यांचे आवाहन मुंबई : मुंबई

Mobile Network in Metro 3 Aqua Line : अखेर तीन महिन्यांनी झाला ‘नो नेटवर्क’चा अंत! मेट्रो-3च्या ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल सेवा सुरळीत सुरु

- दररोज होणार दीड लाख प्रवाशांना फायदा मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ भूमिगत प्रवासादरम्यान मोबाईल

Shrikant Shinde : ‘टिप नाही तर राईड नाही!’ ॲप-आधारित टॅक्सींच्या मनमानीविरोधात श्रीकांत शिंदे आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांची होत असलेली आर्थिक लूट आणि मनमानी थांबवण्यासाठी

Ghatkopar-Mankhurd Link Road : बांगलादेशी भूमाफियांच्या 'लँड जिहाद'वर प्रहार

मानखुर्दमधील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड

Sejal Pawar Controversy Video: प्रणीत मोरेच्या शोमधील महिला डॉक्टरच्या वक्तव्यावरून वाद; मृतदेहांबद्दलचे ते विधान अंगलट; सोशल मीडियावर संताप

मुंबई: 'बिग बॉस' फेम स्टँड-अप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या (Pranit More) शोमधील एका व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) आता नवा वाद