शिवरायांचा अवमान करणाऱ्या कोरटकरची सुटका

कोल्हापूर : राष्ट्रपुरुषांचा अवमान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मोबाइलवरून धमकावणारा प्रशांत मुरलीधर कोरटकर (रा.नागपूर) याची कळंबा कारागृहातून सुटका झाली. न्यायालयाने अटी-शर्तींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोरटकरचा जामीन मंजूर केला होता. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने त्याचा कारागृहातील दोन दिवस मुक्काम वाढला होता. शुक्रवारी सकाळी कोर्ट सुरू झाल्यानंतर कोरटकरच्या सुटकेची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाली. कोल्हापूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अनामत रक्कम भरल्यानंतरच कळंबा कारागृहातून पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर आणण्यात आले. दुपारी २.१५ मिनिटांनी कोरटकरला कारागृहातील अंडासेलमधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला पोलिसाच्या स्वाधीन केले अशी माहिती कारागृहातील वरिष्ठ अधीक्षक नागनाथ सावंत यांनी यावेळी दिली. न्यायालयाने कोरटकरला बुधवारी जामीन मंजूर केला होता. जामिनाचे पत्र कळंबा कारागृहात पोहोचू शकले नव्हते, त्यामुळे त्याची सुटका होऊ शकली नव्हती.



अटींचे पालन करण्याच्या सूचना

फिर्यादी आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव आणू नये. पुरावे नष्ट करू नयेत. चौकशीत पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या परवानगीशिवाय बाहेरगावी जाऊ नये, अशा अटींचे पालन करण्याच्या सूचना त्याला न्यायाधीशांनी दिल्या आहेत. कोरटकर यांच्यावर दोन वेळा हल्ला झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण दिले होते.

घटनाक्रम

  • २५ फेब्रुवारी : इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी. जुना राजवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल.

  • २६ फेब्रुवारी : प्रशांत कोरडकर नागपूरमधून फरार.

  • २७ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला आदर असल्याचा कोरटकरचा व्हीडिओ व्हायरल.

  • ११ मार्च : न्यायालयाकडून कोरटकरला १७ मार्चपर्यंत दिलासा.

  • १८ मार्च : कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

  • २३ मार्च : पोलिसांनी तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय