उल्हासनगर : खोपोली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथून नोकरीच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाड्यांची संख्या वाढवली, निवडक १५ डब्यांच्या गाड्या सोडल्या तरी गर्दी कमी होत नाही. याच गर्दीचा फटका एका २५ वर्षाच्या तरुणाला बसला. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ २५ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.
लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. रोहित मगर असे या तरुणाचे नाव आहे. तो उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता.
रोहित मगर अंबरनाथहून उल्हासनगरला लोकलने प्रवास करत होता. कानसाई ते उल्हासनगर दरम्यान त्याचा अपघात झाला. लोकलमधून पडून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला. रोहितचा अपघात नेमका कसा झाला, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…