Railway News : लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगर : खोपोली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर येथून नोकरीच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाड्यांची संख्या वाढवली, निवडक १५ डब्यांच्या गाड्या सोडल्या तरी गर्दी कमी होत नाही. याच गर्दीचा फटका एका २५ वर्षाच्या तरुणाला बसला. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ २५ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.



लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला. रोहित मगर असे या तरुणाचे नाव आहे. तो उल्हासनगरच्या सम्राट अशोक नगरचा रहिवासी होता.



रोहित मगर अंबरनाथहून उल्हासनगरला लोकलने प्रवास करत होता. कानसाई ते उल्हासनगर दरम्यान त्याचा अपघात झाला. लोकलमधून पडून झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आला. रोहितचा अपघात नेमका कसा झाला, याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments
Add Comment

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे.

Phaltan Doctor death case : ब्रेकिंग! फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात प्रशांत बनकर अखेर अटक

सातारा : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील (Phaltan Sub District Hospital) महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Suicide) प्रकरणात आता एक

वैमानिकाच्या सतर्कतेमुळे मोठे संकट टळले! नागपूरहून उड्डाण केलेल्या विमानाला धडकला पक्षी...

नागपूर: नागपूरहून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानावरील मोठे संकट टळले. विमानाने उड्डाण करताच

राज्यातील बांगलादेशी घुसखोरांना दणका! राज्य सरकारचे मोठे पाऊल, रेशनकार्ड पडताळणीचे आदेश

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत चालली आहे. याकरता राज्यभरात