Aaple Sarkar : 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद

मुंबई : नागरिकांना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुरू केलेले 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. आधुनिकीकरणाचे काम करायचे असल्यामुळे पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोणतेही शासकीय ऑनलाईन काम १४ एप्रिलपर्यंत 'आपले सरकार' पोर्टलद्वारे करता येणार नाही.



शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने फडणवीस सरकारने 'आपले सरकार' पोर्टल १० वर्षांपूर्वी सुरू केले. या पोर्टलद्वारे जलदगतीने सेवा मिळतात. वेगवेगळी प्रमाणपत्र ऑनलाईन पटकन मिळतात. कार्यालयात जाण्याचा, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो. वेळ आणि पैसा यांची बचत होते. आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, ओळख पुरावा, नरेगा जॉब कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र अशी अनेक कागदपत्रे 'आपले सरकार' पोर्टलद्वारे लवकर मिळवता येतात.



शासनाच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित अनेक सेवा 'आपले सरकार' पोर्टलद्वारे उपलब्ध असल्यामुळे सामान्यांचे काम सोपे होते. यामुळे असंख्य नागरिक 'आपले सरकार' पोर्टलचा वापर करतात. मागील काही वर्षात विश्वासार्ह, वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवेमुळे 'आपले सरकार' पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

सध्या राज्यातील ३८ विभागांच्या ४८५ सेवा 'आपले सरकार' पोर्टलवर आहेत. नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळवता येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०१५ पासून आपले सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत एकूण १७ कोटी ६३ लाख ६२ हजार ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १६ कोटी ६१ लाख ३ हजार ९०९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ६६ लाख २३ हजार २७५ अर्ज आले होते.
Comments
Add Comment

Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश मुंबई (विशेष

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :