Aaple Sarkar : 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद

मुंबई : नागरिकांना पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुरू केलेले 'आपले सरकार' पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. आधुनिकीकरणाचे काम करायचे असल्यामुळे पोर्टल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कोणतेही शासकीय ऑनलाईन काम १४ एप्रिलपर्यंत 'आपले सरकार' पोर्टलद्वारे करता येणार नाही.



शासनाच्या विविध सेवा पारदर्शक पद्धतीने आणि जलदगतीने उपलब्ध व्हाव्यात, कामकाज कार्यक्षम व्हावे, या हेतूने फडणवीस सरकारने 'आपले सरकार' पोर्टल १० वर्षांपूर्वी सुरू केले. या पोर्टलद्वारे जलदगतीने सेवा मिळतात. वेगवेगळी प्रमाणपत्र ऑनलाईन पटकन मिळतात. कार्यालयात जाण्याचा, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचतो. वेळ आणि पैसा यांची बचत होते. आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, ओळख पुरावा, नरेगा जॉब कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र अशी अनेक कागदपत्रे 'आपले सरकार' पोर्टलद्वारे लवकर मिळवता येतात.



शासनाच्या वेगवेगळ्या विभागांशी संबंधित अनेक सेवा 'आपले सरकार' पोर्टलद्वारे उपलब्ध असल्यामुळे सामान्यांचे काम सोपे होते. यामुळे असंख्य नागरिक 'आपले सरकार' पोर्टलचा वापर करतात. मागील काही वर्षात विश्वासार्ह, वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवेमुळे 'आपले सरकार' पोर्टल लोकप्रिय झाले आहे.

सध्या राज्यातील ३८ विभागांच्या ४८५ सेवा 'आपले सरकार' पोर्टलवर आहेत. नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळवता येत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, २०१५ पासून आपले सरकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत एकूण १७ कोटी ६३ लाख ६२ हजार ४६८ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १६ कोटी ६१ लाख ३ हजार ९०९ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १ कोटी ६६ लाख २३ हजार २७५ अर्ज आले होते.
Comments
Add Comment

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,

Pune News : पुण्यात आता 'एनडीआरएफ'चा कायमस्वरूपी तळ

मावळमधील तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : आपत्तीच्या काळात तातडीने मदत व बचाव

Wardha Crime : वर्ध्यातील रोठा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण; मुख्यमंत्र्यांचे जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे निर्देश

MUMBAI : वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात घडलेली १२ वर्षीय मुलीवरील अत्यंत अमानुष क्रूरता आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण

Mumbai Local Train : मुंबई लोकल दुर्घटना! रुळ ओलांडताना महिलेचा रेल्वेखाली मृत्यू; विद्याविहार-घाटकोपरदरम्यान घडली घटना

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावर सोमवारी सायंकाळी एक दुर्दैवी दुर्घटना (Accident) घडली. विद्याविहार (Vidyavihar)

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अनमोल बिश्नोईविरुद्ध प्रोडक्शन वॉरंट; विशेष न्यायालयाचा आदेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयाने (MCOCA Court) अनमोल

Mumbai Crime Branch : मुंबईत गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बेकायदेशीर वास्तव्याच्या संशयावरून 37 बांगलादेशी नागरिक ताब्यात

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) शहरातील विविध भागांत विशेष मोहीम राबवत बेकायदेशीररीत्या वास्तव्यास