Tanisha Bhise मृत्यू प्रकरण, डॉ. घैसास यांचा राजीनामा

पुणे : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात गंभीर आरोप झाले. या प्रकरणात दिनानाथ मंगशेकर रुग्णालयात प्रॅक्टिस करत असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. रुग्णालय प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय याची दखल घेऊन डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दिनानाथ मंगशेकर रुग्णालय सोमवारी ७ एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. पत्रकार परिषदेतून रुग्णालय प्रशासन स्वतःची बाजू मांडणार आहे.



याआधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना चाकणकर यांनी मंगेशकर रुग्णालय पैशांसाठी अडून बसले आणि गरोदर महिलेचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवला. माता मृत्यू अन्वेषण समिती सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई होईल, असेही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मंगेशकर रुग्णालय प्रकरणी धर्मादाय आयुक्त स्वतंत्र अहवाल सादर करणार आहेत. हा अहवाल आल्यावर त्या प्रकरणात पुढील निर्णय घेतले जातील; असे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.
Comments
Add Comment

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न