‘सीबीएसई’च्या धर्तीवर इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम

  271

सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली जाणार आहे. त्यासाठीची तयारी बालभारती व शालेय शिक्षण विभागाने केली आहे. ३१ मे पर्यंत शाळा स्तरावर पुस्तक पुरवण्याचे नियोजनही आखले आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार असून तो ‘सीबीएसई’च्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. त्यात चित्रांमधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे. मुलांची आवड लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. जिल्ह्यातील मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. त्यासाठी पुण्याच्या बालभारतीकडून पुस्तके मिळणार आहेत.


तालुका व केंद्र स्तरावर उतरवून घेण्याचे व ती शाळांपर्यंत वेळेत पोचवण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देखील मिळणार आहेत.

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.