‘सीबीएसई’च्या धर्तीवर इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम

सोलापूर : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली जाणार आहे. त्यासाठीची तयारी बालभारती व शालेय शिक्षण विभागाने केली आहे. ३१ मे पर्यंत शाळा स्तरावर पुस्तक पुरवण्याचे नियोजनही आखले आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार असून तो ‘सीबीएसई’च्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. त्यात चित्रांमधून विद्यार्थ्यांना अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न आहे. मुलांची आवड लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.


जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. जिल्ह्यातील मराठी, उर्दू व कन्नड माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. त्यासाठी पुण्याच्या बालभारतीकडून पुस्तके मिळणार आहेत.


तालुका व केंद्र स्तरावर उतरवून घेण्याचे व ती शाळांपर्यंत वेळेत पोचवण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती स्तरावर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश देखील मिळणार आहेत.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात