देशमुख हत्येचा नवा अँगल, सुग्रीव कराडचे नाव आले समोर; चाटे आणि केदारच्या जबाबामुळे वाढला गोंधळ

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुग्रीव कराड हे एक नवे नाव समोर आले आहे.



आवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीला विरोध केल्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. पण या प्रकरणात अटकेत असलेल्यांपैकी जयराम चाटे आणि महेश केदार या दोन आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबातील सुग्रीव कराड कोण आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.



संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचे आतापर्यंत सर्व समजत होते. पण चाटे आणि केदारने दिलेल्या जबाबात सुग्रीव कराड हे वेगळेच नाव पुढे आले आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन सरपंच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती. त्याचा बदला म्हणून घुले आणि त्याच्या साथीदारांनी देशमुख यांना मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असं जयराम चाटे आणि महेश केदारने पोलिसांना सांगितले. चाटे आणि केदार यांच्या जबाबात खंडणीचा उल्लेख कुठेही आलेला नाही.



आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती. सरपंच देशमुख आणि ग्रामस्थांनी सुग्रीव कराडच्या सांगण्यावरुन घुलेला मारहाण केली. या प्रकारामुळे घुले आणि वाल्मिक अण्णा कराडचा अपमान झाल्याचे फरार आरोपी कृष्णा आंधळेने आम्हाला सांगितले. घुले आणि वाल्मिक अण्णा कराडच्या अपमानाचा बदला घ्यावा लागेल, असे आंधळे आम्हाला म्हणाला होता; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले.

घुलेला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला; असे चाटे आणि केदार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्या जबाबामुळे या प्रकरणात सुग्रीव कराड हे नवे नाव पुढे आले आहे. आता हा सुग्रीव कराड असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला