प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. सध्या पोलीस कोठडीतच असलेल्या प्रशांत कोरटकरचा पोलिसांकडचा ताबा आणखी दोन दिवसांनी वाढला आहे.



अटक केल्यानंतर प्रशांत कोरटकरला पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठी पहिल्यांदा पोलिसांनी कोल्हापूर न्यायालयात हजर केले होते. त्या दिवशी एका छत्रपती शिवाजी महाराजप्रेमी व्यक्तीने कोरटकर कोल्हापुरी चप्पल उगारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. तर यावेळी न्यायालयाच्या आवारात एका वकिलानेच कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का, असा सवाल करत अमित भोसले नावाच्या वकिलाने कोरटकरवर झडप घातली. पोलिसांनी त्यांना दूर केले. यानंतर कोरटकर जवळ आणखी पोलीस उभे राहिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.



छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातील एका काँग्रेस पदाधिकार्‍याच्या घरातून अटक केली. यानंतर कोरटकरला कोल्हापूरमध्ये आणण्यात आले. सध्या कोरटकर पोलीस कोठडीत आहे.
Comments
Add Comment

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील

Gadchiroli Crime : संतापजनक घटना! चामोर्शीत ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या

गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील चामोर्शी येथून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात पेंटिंगचे काम

Jaigad Port : रत्नागिरीतील जयगड बंदर पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

 कृषी, औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना जोडणी; स्वतंत्र द्रुतगती महामार्ग बांधणार मुंबई : कोकण किनारपट्टीवरील