Airtel : आयपीएल सुरू होण्याआधी एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर नेटवर्क वाढवले

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२५ स्पर्धा २२ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांच्या तयारीसाठी भारती एअरटेलने वानखेडे स्टेडियमवर सर्वसमावेशक व्यवस्था केली आहे. या सामन्यांना किमान लाखभर क्रिकेट चाहते स्टेडियमवर येण्याची शक्यता आहे. या क्रिकेटप्रेमींना तसेच आसपासच्या परिसरातील हजारो नागरिकांना विनाअडथळा सलग आणि उत्तम नेटवर्क मिळावे यासाठी भारती एअरटेलने नियोजन केले आहे.





एअरटेलने स्टेडियमच्या आसपासच्या भागात आपल्या सध्याच्या सेल साइट्स मधील सात साइट्स वाढवल्या आहेत. ही वाढ केल्याने सामने पहायला येणाऱ्या एअरटेल ग्राहकांना व्हॉईस आणि डेटा कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येणार आहे. नेटवर्कची श्रेणी वाढविण्याचे धोरणात्मक नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा केल्या जाणाऱ्या प्रेक्षकांना सामावून घेता येईल.



तयारीवर बोलताना, आदित्य कुमार कंकारिया, सीईओ, मुंबई भारती एअरटेल म्हणाले, "आगामी आय.पी.एल स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रेक्षक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणून आम्ही वानखेडे स्टेडियममधील मोबाइल नेटवर्कच्या पायाभूत सुविधांची श्रेणी वाढविली आहे. आमचे ग्राहक अखंडपणे जोडलेले राहतील हे या वाढीमुळे सुनिश्चित केले जाणार आहे आणि त्यायोगे ग्राहकांना वास्तविक काळात (रिअल-टाइममध्ये) कार्यक्रमाची उत्साही ऊर्जा टिपता येईल आणि इतरांना त्यात सहभागी करून घेता येईल."



मुंबई शहरात अखंड आणि सर्वत्र आढळणारा नेटवर्क अनुभव देता यावा म्हणून विमानतळ, रेल्वे स्थानके, महत्वपूर्ण ठिकाणे, ज्यात सामील आहेत मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, चर्चगेट रेल्वे स्टेशन, मरीन लाइन स्टेशन आणि गेट वे ऑफ इंडिया, अशा प्रमुख ठिकाणी व्यापक नेटवर्क अनुकूल करण्याचे आयोजन केले गेले आहे. शहरातील ओबेरॉय (ट्रायडंट) आणि ताज कुलाबा सोबतच सर्व प्रीमियम हॉटेल्स मध्ये सुद्धा कव्हरेज वाढविण्यासाठी व्यापक नेटवर्क मूल्यांकन करण्यात आले आहे.



एअरटेलने खास करून आय.पी.एल साठी पावले उचलली आहेत व देशातील सर्व स्टेडियममध्ये आपले नेटवर्क वाढवले आहे जेणेकरून मार्चपासून सुरू होऊन मे २०२५ पर्यंत सुरू राहणाऱ्या क्रिकेट उत्साहासाठी ग्राहकांना उत्तम सेवा देता येईल.
Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या