आयपीएलच्या ‘भागिदारी’त कोहलीचाच ‘विराट’ सहभाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये फलंदाजांची भागीदारी महत्त्वाची असते. भागीदारीमुळेच संघ मोठा खेळ करू शकतो. जेव्हा मोठी भागीदारी होते तेव्हा गोलंदाजी संघावर दबाव वाढतो. आयपीएलही याला अपवाद नाही. आयपीएलच्या इतिहासात अशा टॉप-५ जोड्या आहेत ज्यांनी मिळून हजारो धावा केल्या आहेत, पण यंदा एकही जोडी पुन्हा मैदानावर दिसणार नाही. पण त्यांची कामगिरी लीगच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये कोरल्या गेल्या आहेत.



१. कोहली-डिव्हिलियर्स : ३१२३ धावा
आयपीएलमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा जोडण्याचा विक्रम विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्या नावावर आहे. २०२० मध्ये ही जोडी शेवटची एकत्र खेळली होती. ७६ डावांमध्ये विराट आणि डिविलियर्स यांनी ४४ च्या सरासरीने ३१२३ धावा जोडल्या आहेत. त्यांची सर्वात मोठी भागीदारी २२९ धावांची आहे.



२. कोहली-गेल : २७८७ धावा
२०११ ते २०१७ या कालावधीत विराट कोहली आणि ख्रिस गेल यांची जोडी आयपीएलमध्ये चमकदार ठरली. केवळ ५९ डावांमध्ये या दोघांनी ५२.५८ च्या सरासरीने २७८७ धावा केल्या. या जोडीने २०४ धावांची नाबाद भागीदारी देखील केली आहे, जी आयपीएलमधील सर्वोत्तम भागीदाऱ्यांपैकी एक आहे. मात्र, त्यांच्या दमदार कामगिरीनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.



३. धवन-वॉर्नर : २३५७ धावा
शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या डावखुऱ्या जोडीने २०१४ ते २०१७ पर्यंत सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळले. या काळात, संघाने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपदही पटकाले. धवन आणि वॉर्नर यांनी ५० डावांमध्ये एकत्र फलंदाजी केली आणि ४८ च्या सरासरीने २३५७ धावा केल्या.

४. कोहली-फाफ डू प्लेसिस : २०३२ धावा
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसची जोडी आता तुटली आहे. द. आफ्रिकेचा खेळाडू फाफ डू प्लेसिस नवीन हंगामात दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला आहे. २०२२ मध्ये, तो आरसीबीचा भाग झाला आणि विराटसोबत डावाची सुरुवात करायचा. या जोडीने ४१ डावांमध्ये सुमारे ५० च्या सरासरीने २०३२ धावा जोडल्या.

५. गंभीर-उथप्पा : १९०६ धावा
गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा ही जोडी टॉप-५ आहे. पण हे दोन्ही खेळाडू निवृत्त झाले आहेत. २०१४ मध्ये, या जोडीमुळे केकेआरने आयपीएलचे विजेतेपद जिंकले. २०१४ ते २०१७ या कालावधीत गंभीर आणि उथप्पा यांनी ४८ डावांमध्ये एकत्र बॅटिंग केली. या दरम्यान त्यांनी ४० च्या सरासरीने आणि ५ शतकी भागीदाऱ्या रचल्या. तर या जोडीने एकूण १९०६ धावा जोडल्या.
Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील