महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग प्रकल्प’ सारखे अभिनव उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहेत. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक संकल्पनांना व्यासपीठ मिळते. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील विकसित भारताचा पाया आहेत. विज्ञान हा विषय पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकातून जास्त उमगतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोनदा आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहावे, असे मत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांचे व्यक्त केले.


मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्यावतीने महानगरपालिका शाळांतील प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर विजेत्या शाळांचे ‘विज्ञान प्रदर्शन व माझी परसबाग’ आणि पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करी रोड येथील ना. म. जोशी शाळा संकुल येथे गुरुवारी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रामुख्याने प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शन स्पर्धांमधून विजेत्या ठरलेल्या एकूण २३ शाळांचे विज्ञान प्रकल्प प्रदर्शनार्थ मांडण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर या बोलत होत्या.


उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तीवर्धन किरतकुडवे, शाळा अक्षीक्षक छाया साळवे, सर्व उप शिक्षण अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि सहभागी विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थित होते.


महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात आलेले हे विज्ञान प्रदर्शन पाहून अतिशय आनंद होत आहे. मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने या प्रदर्शनातून अनेक वैज्ञानिक कल्पनांना मूर्त रुप आले आहे. हे प्रदर्शन खरोखरच अतिशय उत्कृष्ट आहे. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील विकसित भारताचा पाया आहेत. विज्ञान हा विषय पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकातून जास्त उमगतो. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन वर्षातून किमान दोनदा आयोजित करण्यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्नशील राहावे, असेही त्यांनी नमूद केले.


या प्रदर्शनात प्रामुख्याने शून्य कचरा नियोजन, गणितीय सूत्रांवर आधारित प्रकल्प, ई-सायकल मिशन, सेंद्रीय शेती, स्मार्ट सिटी, हायड्रोईलेक्ट्रीक पॉवर जनरेटर, वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, पूर सूचना प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा प्रणाली व सुरक्षा उपाययोजना यासह विविध विषयांवरील विज्ञान प्रकल्पांचा समावेश होता.


विज्ञान प्रदर्शनात शालेय खुला गटामध्ये पी/दक्षिण विभागातील मिठानगर मुंबई पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेने कचरा व्यवस्थापन विषयावरील प्रकल्प सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला. एन विभागातील पंतनगर मुंबई पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम) शाळेने ‘SMART SPIKE DEFFENCE SYSTEM’ या विषयावरील प्रकल्प सादर करुन द्वितीय क्रमांक पटकावला, तर एफ उत्तर विभागातील सायन मुंबई पब्लिक स्कूलने अग्निशमन यंत्रणा नियोजन विषयावरील प्रकल्प सादर करुन तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही शाळांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार आणि ५ हजार रुपयांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.


परसबाग प्रकल्प शालेय खुला गटामध्ये ई विभागातील मोमीनपुरा मुंबई पब्लिक स्कूल (सेमी इंग्रजी माध्यम) शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. एन विभागातील बर्वेनगर मराठी शाळेने द्वितीय तर पी दक्षिण विभागातील आय. बी. पटेल मुंबई पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक पटकावला. तिन्ही शाळांना अनुक्रमे ११ हजार, ८ हजार आणि ५ हजार रुपयांचे रोख रक्कम स्वरुपात बक्षिस प्रदान करण्यात आले.

Comments
Add Comment

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना

Marathi :मराठीचे धिंडवडे काढणारा 'तो' फलक अखेर हटवला

 'प्रहार'च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मराठी भाषेची आणि व्याकरणाची

Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे.

मुंबईसह महत्त्वाच्या शहरांत मिळणार गरमागरम ‘मत्स्य पाव’- मंत्री नितेश राणे

 मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; रोजगारनिर्मितीसाठी राबवणार मोबाईल फूड व्हॅन योजना मुंबई : राज्यातील

लालपरीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी ‘पालक अधिकारी’ नेमणार;  मंत्री प्रताप सरनाईक

 मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; प्रत्येक आगाराला उत्पन्नाचे टार्गेट देणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग