अलिबागच्या शिक्षकाची अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या

वाशी : अलिबागमधील कुर्डुस नावाच्या गावात राहणाऱ्या वैभव पिंगळे या ४५ वर्षांच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अर्थात शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी घडली. सेक्सटॉर्शनला वैतागून वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वैभव पिंगळे हे क्रेटा कारने अटल सेतूवर आले. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. नंतर पुलावरुन समुद्रात उडी मारली. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने सेतूवर एक कार थांबली असल्याचे पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस पोहचण्याआधीच वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केली होती.



मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी वैभव पिंगळेंना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले होते. पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. या प्रकाराला वैतागलेले वैभव पिंगळे प्रचंड मानसिक ताणाखाली होते. त्यांनी पोलिसांची मदत घेण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे प्राथमिक तपासातून समजले आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. उलवे पोलीस तपास करत आहेत.

याआधी २०२४ मध्ये अटल सेतूवरुन आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. सावध असलेल्या पोलिसांनी उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला ताब्यात घेतले होते.
Comments
Add Comment

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण

Eknath Shinde : शिंदेंकडून निलेश राणेंचं तोंडभरून कौतुक! "इलाका किसी का भी हो, धमाका निलेश राणेच करणार"; मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला

मालवणमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथे धुक्यामुळे भीषण अपघात

शिवशाही बस, ट्रकमध्ये धडक; १ ठार, ११ जखमी प्रमोद जाधव माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी

Narayan Rane : 'कोण आदित्य ठाकरे?' "बाळासाहेबांनंतर शिवसेना राहिली नाही! नारायण राणेंचा उद्धव गटावर हल्लाबोल

चिपळूण : भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज चिपळूण दौऱ्यादरम्यान शिउबाठा नेतृत्वावर अत्यंत कडक शब्दांत टीका