अलिबागच्या शिक्षकाची अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या

वाशी : अलिबागमधील कुर्डुस नावाच्या गावात राहणाऱ्या वैभव पिंगळे या ४५ वर्षांच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अर्थात शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी घडली. सेक्सटॉर्शनला वैतागून वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.



शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास वैभव पिंगळे हे क्रेटा कारने अटल सेतूवर आले. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. नंतर पुलावरुन समुद्रात उडी मारली. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाने सेतूवर एक कार थांबली असल्याचे पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण पोलीस पोहचण्याआधीच वैभव पिंगळे यांनी आत्महत्या केली होती.



मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी वैभव पिंगळेंना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले होते. पैसे उकळण्यास सुरुवात केली होती. या प्रकाराला वैतागलेले वैभव पिंगळे प्रचंड मानसिक ताणाखाली होते. त्यांनी पोलिसांची मदत घेण्याऐवजी आत्महत्येचा पर्याय निवडल्याचे प्राथमिक तपासातून समजले आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. उलवे पोलीस तपास करत आहेत.

याआधी २०२४ मध्ये अटल सेतूवरुन आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. सावध असलेल्या पोलिसांनी उडी मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेला ताब्यात घेतले होते.
Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण