‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो. केवळ भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील आणि प्रामुख्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियातील खवय्यांना हापूसची गोडी लागली आहे. गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी जगभरात ओळख असलेल्या ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनाच्या (जीआय टँग) मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या कोकणपट्ट्यातील हापूस आंब्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या या मानांकनाला गुजरातकडून थेट आव्हान दिले गेले आहे. गुजरात सरकारच्या पाठबळावर ‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्यात आल्यामुळे कोकणातील आंबा उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.


२०१८ मध्ये मिळालेल्या मानांकनामुळे कोकण हापूसला सुरक्षित बाजारपेठ मिळाली असतानाच नवीन दाव्यांमुळे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘कोकण हापूस’ हा जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा आहे, २०१८ साली मिळालेल्या या जीआय टॅगमुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व परिसरातील हापूस उत्पादकांना बाजारात वेगळी ओळख, चांगला दर आणि संरक्षण मिळाले.


कोकण हापूसला मानांकन मिळाल्यानंतर २०२२ मध्ये शिवनेरी हापूस आंबा नावाने भौगोलिक मानांकनासाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अर्ज केला होता. त्यानंतर २०२३ मध्ये गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केला. त्यावर ३० ऑक्टोबरला पहिली सुनावणी झाली. गुजरातमधील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या पुढाकारातून २०२३ मध्ये ‘वलसाड हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.


भेसळीचा प्रश्न अद्यापही गंभीर : सध्या कर्नाटक, केरळ, तमिळनाडू तसेच महाराष्ट्राच्या इतर भागातील आंब्यांची ‘कोकण हापूस’ म्हणून भेसळ केली जाते. भेसळ रोखण्यासाठी क्यूआर कोडसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्या, तरीही गैरप्रकार पूर्णपणे थांबलेले नाहीत. अशा परिस्थितीत ‘वलसाड हापूस’ला मानांकन मिळाल्यास भेसळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. ‘कोकण हापूस’ हे नाव कोणत्याही एका राज्यासाठी नसून विशिष्ट भौगोलिक, हवामान आणि मातीच्या परिस्थितीत पिकलेल्या आंब्यासाठी राखीव आहे. कोकणातील चार जिल्ह्यांतील वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमुळेच या आंब्याची चव, रंग आणि टिकाऊपणा वेगळा ठरतो. जर गुजरातच्या ‘वलसाड हापूस’ला स्वतंत्र जीआय टॅग मिळाला, तर कोकणातील हजारो आंबा उत्पादकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. यापूर्वी आफ्रिकेतील मलावी देशातून येणाऱ्या ‘मलावी हापूस’ या नावावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. भविष्यात ‘कर्नाटक हापूस’ किंवा अन्य नावांनी अर्ज झाले, तरी त्यालाही कडाडून विरोध केला जाईल.- डॉ. विवेक भिडे, कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते संघटना

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह