Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा


चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचा किती आदर करतात, याची प्रचिती नुकतीच चिपळूणमध्ये आली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांची प्रकृती एका कार्यक्रमात बिघडल्यानंतर, त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि सध्याचे प्रखर विरोधक आमदार भास्कर जाधव यांनी राणे साहेबांबद्दल अत्यंत भावूक वक्तव्य केलं आहे. "राजकीय मतभेद असले तरी आमच्यातील जुना जिव्हाळा आजही कायम आहे," असे म्हणत जाधवांनी राणे साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम केला.



राणे साहेबांचा तो उत्साह आणि धावपळीचे जीवन


चिपळूणमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना राणे साहेबांना अचानक भोवळ आली. प्रकृती साथ देत नसतानाही, केवळ लोकांसाठी व्यासपीठावर उभे राहण्याच्या त्यांच्या दांडग्या उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "राजकारण्यांना २४ तास काम करावे लागते, सण-उत्सव नसतात आणि ९९ टक्के नेत्यांना वेळेवर जेवणही मिळत नाही. राणे साहेबांनी आयुष्यभर जनतेसाठी जी धावपळ केली, त्याचाच हा परिणाम आहे."



मनातील जुने ऋणानुबंध कधीही...


भास्कर जाधव यांनी राणे साहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. "मी आणि राणे साहेबांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमचे केवळ राजकीयच नाही, तर घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. माझं बेधडक वागणं आणि स्पष्टपणे बोलणं राणे साहेबांना नेहमीच आवडत असे. आमच्या वयात केवळ ५-६ वर्षांचे अंतर आहे. राजकीय प्रवासात काही वळणांवर आमच्यात अंतर पडले, बोलण्यात कटुता आली, तरीही मनातील जुने ऋणानुबंध कधीही पुसले जाऊ शकत नाहीत," असे सांगताना जाधव काहीसे भावूक झाले होते.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'पात्र लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहणार नाहीत'

रायगड : बोरीचा माळ सारख्या छोट्या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे आता तुम्हाला रोज

Ratnagiri : चार वाहनांना धडक देऊन ट्रक कोसळला विहिरीत

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे हातखंबा येथे चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाचा नवा मार्ग निश्चित; कोकणातील 'या' ९ गावांतून सुसाट धावणार गाड्या!

मुंबई : राज्यातील प्रस्तावित 'शक्तीपीठ महामार्गा'बाबत (शेतकऱ्यांनी दर्शवलेला तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच