Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा


चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचा किती आदर करतात, याची प्रचिती नुकतीच चिपळूणमध्ये आली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांची प्रकृती एका कार्यक्रमात बिघडल्यानंतर, त्यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि सध्याचे प्रखर विरोधक आमदार भास्कर जाधव यांनी राणे साहेबांबद्दल अत्यंत भावूक वक्तव्य केलं आहे. "राजकीय मतभेद असले तरी आमच्यातील जुना जिव्हाळा आजही कायम आहे," असे म्हणत जाधवांनी राणे साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम केला.



राणे साहेबांचा तो उत्साह आणि धावपळीचे जीवन


चिपळूणमधील एका कार्यक्रमात भाषण करत असताना राणे साहेबांना अचानक भोवळ आली. प्रकृती साथ देत नसतानाही, केवळ लोकांसाठी व्यासपीठावर उभे राहण्याच्या त्यांच्या दांडग्या उत्साहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, "राजकारण्यांना २४ तास काम करावे लागते, सण-उत्सव नसतात आणि ९९ टक्के नेत्यांना वेळेवर जेवणही मिळत नाही. राणे साहेबांनी आयुष्यभर जनतेसाठी जी धावपळ केली, त्याचाच हा परिणाम आहे."



मनातील जुने ऋणानुबंध कधीही...


भास्कर जाधव यांनी राणे साहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. "मी आणि राणे साहेबांनी अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले आहे. आमचे केवळ राजकीयच नाही, तर घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. माझं बेधडक वागणं आणि स्पष्टपणे बोलणं राणे साहेबांना नेहमीच आवडत असे. आमच्या वयात केवळ ५-६ वर्षांचे अंतर आहे. राजकीय प्रवासात काही वळणांवर आमच्यात अंतर पडले, बोलण्यात कटुता आली, तरीही मनातील जुने ऋणानुबंध कधीही पुसले जाऊ शकत नाहीत," असे सांगताना जाधव काहीसे भावूक झाले होते.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह