GBS Update : पुणे, मुंबई नंतर आता नागपूरातही एका रुग्णाचा मृत्यू; राज्यात मृतांचा आकडा १० वर पोहचला!

नागपूर : नागपुरात GBS आजाराने आणखी एका रुग्णाचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मुंबईनंतर नागपूरमध्येही एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. GBS च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.



मुंबईतील नायर रुग्णालयात GBS आजाराने बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच आता नागपूर येथील पार्डी परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय रुग्णाचा GBSने बळी घेतला आहे. रुग्णाला ११ फेब्रुवारी रोजी पक्षाघाताचा झटका आल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय पक्षाघातामुळे लुळे पडले. त्याला श्वास घ्यायला आणि रक्तदाबाचा त्रासही होत होता.


शुक्रवारी या रुग्णाची प्रकृती खराब झाली असता त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान पुण्यात ८, मुंबईत १ आणि नागपूरमध्ये १ अशा १० रुग्णांचा मृत्यू GBS मुळे झाला आहे. यावर सरकार ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि