कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक


रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम राहणार आहेत. दिवा-पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर दोन नवीन क्रॉसओव्हरचे काम सुरू असून ते सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने १५ डिसेंबरपर्यंत प्री-एनआय आणि एनआय ब्लॉक जाहीर केला आहे. तळोजा पाचनंद येथे सुरू असलेल्या क्रॉसओव्हर कमिशनिंगदरम्यान सिग्नल आणि मार्गरचना सुधारण्यासाठी काही गाड्या विलंबाने सोडणार आहेत.


या ब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या कोकण मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. १५ डिसेंबरपर्यंत हे बदल प्रभावी राहणार आहेत. काही गाड्यांच्या उशीरा निघणार आहेत. मडगाव-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (२०११२) ही गाडी ३० मिनिटे उशिरा सुटणार असून तिरुवनंतपुरम नॉर्थ–एलटीटी एक्स्प्रेस ६० मिनिटांनी, तर मंगळुरू–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ५० मिनिटांनी उशिरा धावणार आहे. त्याचबरोबर, १४ डिसेंबरला सुटणारी मडगाव–मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (२०११२) ६० मिनिटांच्या विलंबाने धावेल, तर १५ डिसेंबर रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस (१०१०३) ३० मिनिटांच्या विलंबाने निघेल. पनवेल–कळंबोलीदरम्यान सुरु असलेल्या प्रकल्पाच्या कामासाठी मध्य रेल्वेने १६ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त ब्लॉक जाहीर केला आहे. रविवार (१४ डिसेंबर) आणि मंगळवार (१६ डिसेंबर) या दिवशी मध्यरात्री १.३० ते ३ .३० दरम्यान पावर ब्लॉक असेल. या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार असून एकूण १२ मेल–एक्स्प्रेस गाड्या विलंबाने धावणार आहेत.

Comments
Add Comment

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह