Latur School : विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात! लातूरमध्ये 'या' शाळेला ठोकले टाळे

  100

लातूर : राज्यातल्या बोगस अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई करण्यात येते. खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक शाळांना टाळे ठोकले आहे. दरम्यान, लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खासगी शाळेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेने लातूरमधील 'नारायण ई-टेक्नो' शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आले आहे. (Latur School)



मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील अंबाजोगाई रोडवर नारायण ई-टेक्नो शाळा मागील एक वर्षांपासून मान्यता नसताना सुरू होती. वारंवार नोटीस पाठवली, पण फरक पडला नाही. त्यामुळे दंड ठोठावत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शाळेला जिल्हा परिषदेकडून तब्बल १९ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोकत कुलूप ठोकण्यात आले आहे.


दरम्यान, या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जवळपास ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याचे अनधिकृतपणे अ‍ॅडमिशन करून घेण्यात आले आहे. मात्र मागच्या १ वर्षापासून ही शाळा शासनाच्या कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्यामुळे ही शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे असणार आहे. (Latur School)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या