Latur School : विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात! लातूरमध्ये 'या' शाळेला ठोकले टाळे

लातूर : राज्यातल्या बोगस अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून योग्य कारवाई करण्यात येते. खासगी शाळांकडे पालकांचा वाढता ओढा असल्यामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने प्राथमिक शाळांना टाळे ठोकले आहे. दरम्यान, लातूरमधील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खासगी शाळेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा परिषदेने लातूरमधील 'नारायण ई-टेक्नो' शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आले आहे. (Latur School)



मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील अंबाजोगाई रोडवर नारायण ई-टेक्नो शाळा मागील एक वर्षांपासून मान्यता नसताना सुरू होती. वारंवार नोटीस पाठवली, पण फरक पडला नाही. त्यामुळे दंड ठोठावत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शाळेला जिल्हा परिषदेकडून तब्बल १९ लाख ९० हजार रूपयांचा दंड ठोकत कुलूप ठोकण्यात आले आहे.


दरम्यान, या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जवळपास ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र याचे अनधिकृतपणे अ‍ॅडमिशन करून घेण्यात आले आहे. मात्र मागच्या १ वर्षापासून ही शाळा शासनाच्या कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू असल्यामुळे ही शाळा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांबाबत प्रशासन काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे असणार आहे. (Latur School)

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये