Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७ वाजता भीषण स्फोट झाला. बारुद आणि डेटोनेटरसह विविध स्फोटक साहित्य तयार करणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच किमान १५ जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



स्फोटानंतर आग; बचावकार्य वेगात :


स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठा आवाज होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात आग लागली असून अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



आमदारांचा गंभीर आरोप :


काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मात्र या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. कंपनीकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. आवश्यक प्रशिक्षण आणि सुरक्षा उपाययोजना न करता कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



वर्षभरापूर्वीही अशाच प्रकारची घटना :


याच राऊळगाव शिवारातील कोतवालबड्डी परिसरात वर्षभरापूर्वी ‘एशियन फायर वर्क्स’ या स्फोटक कंपनीतही मोठा स्फोट झाला होता. फटाक्यांची वात तयार करताना झालेल्या त्या स्फोटात चार कामगारांपैकी दोघांचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते.


सध्याच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी