Holi 2026 : रंग-पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्के वाढ, तरीही खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा रंगांनी न्हाऊन निघाल्या आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुलिवंदन सणासाठी लागणारे पर्यावरणपूरक रंग आणि विविध आकारांच्या रंगीबेरंगी पिचकाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. मात्र यंदा रंग व पिचकाऱ्यांच्या किंमतीत सरासरी पाच टक्क्यांची वाढ झाल्याने ग्राहकांना किंचित अधिक पैसे मोजावे लागत आहेत.


यंदा होळी सोमवारी २ मार्च रोजी असून त्यानंतर मंगळवारी धुलिवंदन साजरे केले जाणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही रंगांची उधळण करण्याची परंपरा उत्साहात पाळली जाते. त्यामुळे बाजारात साध्या पिचकाऱ्यांपासून बंदूक प्रकार, टँकर पिचकाऱ्या तसेच लहान मुलांसाठी आकर्षक डिझाइन उपलब्ध झाली आहेत. विशेष म्हणजे छोटा भीम, बेन १० आणि बार्बी यांच्या चित्रांसह पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे.


पिचकाऱ्यांच्या किंमती १० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत आहेत. काही ठिकाणी दर स्थिर असले तरी अनेक ठिकाणी ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतीमुळे दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.


महागाईची झळ बसत असली तरी सणाचा उत्साह कमी झालेला नाही. अलिबागसह जिल्ह्यातील विविध बाजारपेठांत खरेदीला सुरुवात झाली असून सुमारे २५ टक्के खरेदी पूर्ण झाल्याचे विक्रेते संदेश तुणतुणे यांनी सांगितले. धुलिवंदनच्या आदल्या दोन दिवसांत ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या