Weather Update : थंडी पळाली; आता बसणार उन्हाचा चटका! हवामान विभागाचा अंदाज

  115

मुंबई : यंदा हिवाळी मोसमाला सुरुवात होताच तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडीने चांगलाच जोर धरला होता. मात्र त्यानंतर सातत्याने वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आता थंडी नाहीशी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने (IMD) फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे गारठा कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. (Weather Update)



हवामान विभागाचे महासंचालक यांनी फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये 'देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या लाटांचा कालावधी कमी होणार असल्याचे सांगितले.


त्याचबरोबर देशभरात थंडीच्या लाटांचा कालावधी घटणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या महिन्यात पावसाचा अधिक प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे सामान्यत: अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. (Weather Update)

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली