Weather Update : थंडी पळाली; आता बसणार उन्हाचा चटका! हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : यंदा हिवाळी मोसमाला सुरुवात होताच तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडीने चांगलाच जोर धरला होता. मात्र त्यानंतर सातत्याने वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आता थंडी नाहीशी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने (IMD) फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे गारठा कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. (Weather Update)



हवामान विभागाचे महासंचालक यांनी फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये 'देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या लाटांचा कालावधी कमी होणार असल्याचे सांगितले.


त्याचबरोबर देशभरात थंडीच्या लाटांचा कालावधी घटणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या महिन्यात पावसाचा अधिक प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे सामान्यत: अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. (Weather Update)

Comments
Add Comment

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना