Weather Update : थंडी पळाली; आता बसणार उन्हाचा चटका! हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : यंदा हिवाळी मोसमाला सुरुवात होताच तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडीने चांगलाच जोर धरला होता. मात्र त्यानंतर सातत्याने वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आता थंडी नाहीशी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने (IMD) फेब्रुवारी महिन्यात राज्यात थंडी कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच संपूर्ण महाराष्ट्रात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे गारठा कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. (Weather Update)



हवामान विभागाचे महासंचालक यांनी फेब्रुवारी महिन्यातील तापमान आणि पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये 'देशाच्या बहुतांशी भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीच्या लाटांचा कालावधी कमी होणार असल्याचे सांगितले.


त्याचबरोबर देशभरात थंडीच्या लाटांचा कालावधी घटणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विशेषत: कोकण आणि मध्य महाराष्ट्रात या महिन्यात पावसाचा अधिक प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे सामान्यत: अधिक पाऊस पडेल असा अंदाज आहे. (Weather Update)

Comments
Add Comment

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या