युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा दत्ताही तिच्या मुलीसह संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकली होती. मात्र काही दिवसानंतर ती आपल्या मुलगी सायरासह सुरक्षितपणे भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने त्या काळातील भीतीदायक अनुभव सांगितला.


मध्यपूर्वेत इराण , इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे हवाई हल्ल्यांचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीत अनेक भारतीय नागरिकांसह काही चित्रपट कलाकारही यूएईमध्ये अडकले होते. त्यात लारा दत्ता हिचाही समावेश होता. यापूर्वी सोनल चौहान, उर्वशी रौतेला आणि इशा गुप्ता या अभिनेत्री देखील दुबईहून भारतात परतल्या होत्या.


लारा दत्ताने काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करून तेथील तणावपूर्ण परिस्थितीची माहिती दिली होती. त्यात तिने सांगितले होते की, ती तिच्या १४ वर्षांच्या मुलीसोबत दुबईमध्ये होती. तिचे पती महेश भूपती हे त्या वेळी कामानिमित्त लंडन येथे होते. मुलगी सायराला नामांकित प्रशिक्षकाकडे टेनिसचे प्रशिक्षण देण्यासाठी ती दुबईला गेली होती.


तणाव वाढत असताना नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. लारा दत्ताने सांगितले की, त्या काळात संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी चांगली व्यवस्था केली होती. तरीही परिस्थिती गंभीर असल्याने तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.


भारताकडे परतण्याचा निर्णय सोपा नव्हता. लाराच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिची मुलगी जेथे राहत होत्या ते ठिकाण जेबेल अली पोर्ट पासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर होते आणि त्या परिसरात स्फोटांच्या घटना घडत होत्या. त्यामुळे त्यांनी धोका पत्करत तेथून निघण्याचा निर्णय घेतला.


यानंतर त्यांनी सुमारे दोन तासांचा प्रवास करून फुजैराला पोहोचून तेथून विमानाने भारतात परतण्याचा मार्ग निवडला. लाराने सांगितले की, ते निघण्याच्या आदल्या दिवशीच त्या परिसरातील विमानतळ आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ स्फोट झाले होते. त्यामुळे तो प्रवास अत्यंत भीतीदायक होता.


काही तासांच्या अनिश्चिततेनंतर लारा दत्ता आणि तिची मुलगी सुरक्षितपणे भारतात पोहोचल्या. त्या काळातील अनुभव खूपच तणावपूर्ण आणि थरारक असल्याचे तिने सांगितले.

Comments
Add Comment

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.

ग्रामीण मनोरंजनासाठी ‘किस्सा शुरू टॉकीज’!

ग्रामीण महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने नवीन चित्रपट पाहण्यासाठी

Deepa Sawant-Khot : मर्डर मिस्ट्रीची ‘तलास’

कलेची आवड माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळे कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्यातून मार्ग काढून त्या कलेची

Usha Nadkarn : स्पष्ट बोलण्यास कारण की...

स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती

Pedii Box Office Collection : पेड्डीचा बॉक्स ऑफिसवर धडाका! 2 दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi kapoor) यांचा बहुचर्चित 'पेड्डी' (Peddi) चित्रपट बॉक्स