आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.


मुंबई महानगर क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचा या योजनेत सहभाग वाढवण्यासाठी मंत्रालयात मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शांताराम मोरे, सुलभा गायकवाड, चंद्रकांत पाटील, अभिजित पाटील, मनीषा चौधरी, दिलीप लांडे, संजय उपाध्याय तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी बोलताना मंत्री आबिटकर म्हणाले की, गरीब व गरजू नागरिकांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा राज्य शासनाचा प्रमुख उद्देश आहे. या पार्श्वभूमीवर आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळावा यासाठी मोठ्या व नामांकित खासगी रुग्णालयांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे.


मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून त्याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांनाही मिळावा, यासाठी खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाकडून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्य शासनाने या योजनेतील उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढवली आहे. तसेच उपचारांच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. रुग्णालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने निश्चित कालमर्यादेत पार पडत आहे. गुणवत्ता निकष पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना अतिरिक्त प्रोत्साहन रक्कमही दिली जात आहे.





गेल्या वर्षभरात घेतलेल्या विविध सुधारात्मक निर्णयांमुळे रुग्णसंख्या, उपचारांची संख्या आणि त्यावरील खर्चातही लक्षणीय वाढ झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.


तसेच योजनेचे जिल्हा समन्वयकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे, तसेच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जनआरोग्य समित्यांच्या नियमित बैठका घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.


दरम्यान, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनीही राज्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असून खासगी रुग्णालयांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनेत सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.


बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी योजनेत करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. तर राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी उपचारांतील वाढ, दरातील बदल, ऑनलाईन प्रणाली आणि दाव्यांच्या वेळेवर अदायगी याबाबत सादरीकरण केले.


यावेळी उपस्थित आमदार तसेच मुंबई महानगर परिसरातील खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनीही आपली मते मांडली.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू

NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला CBI कोठडी, नांदेडमधये पालकांची सीबीआय चौकशी

मुंबई : नीट युजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी मनीषा मांढरेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Krunal Pandya : हार्दिकच्या लग्नाला कृणाल पांड्या गैरहजर राहणार ? चर्चांमागचं नेमकं कारण काय ?

IPL 2026 : हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयपीएल २०२६ संपण्याआधीच हार्दिक पांड्या मॉडेल आणि इन्फ्लुएंसर

Kirit Somaiya : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, किरीट सोमय्यांची मागणी

मुंबई : मुंबईत उघड्यावर कुर्बानी देण्यास बंदी घाला, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. बीएमसी आणि