आनंदाची बातमी, व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एक आनंदाची बातमी आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांची कपात झाली आहे. यामुळे १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर जो राजधानी दिल्लीत १८०४ रुपयांत उपलब्ध होता तो आता १७९७ रुपयांत मिळेल. किमतीतील कपातीमुळे १९ किलोचा एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांचा एलपीजीवरील खर्चात कमी होण्यास मदत होणार आहे.



जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या दरातले बदल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याआधारे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचे दर निश्चित होत असतात. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज सकाळी तेल कंपन्या जाहीर करतात. तर सीएनजी, पीएनजी यांच्या दरात अधूनमधून बदल होतात. हे बदल संबंधित कंपन्यांकडून जाहीर केले जातात. एलपीजीचा दर साधारणपणे दर महिन्याच्या एक तारखेला जाहीर केला जातो. या व्यवस्थेनुसार कंपन्यांनी शनिवार १ फेब्रुवारी रोजी दरांबाबत घोषणा केली. कंपन्यांच्या घोषणेनुसार आता व्यावसायिक सिलिंडर सात रुपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली होती.

स्थानिक कर आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरात राज्यानुसार बदल होतात. एलपीजीच्या किमती राज्यानुसार बदलतात. हा बदल किरकोळ असला तरी कमी झालेल्या दरांमुळे देशभरातली एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना फायदा होईल.

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली

मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

मणिपूरमध्ये १४ दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त

इंफाळ : भारतीय लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलीस यांनी डोंगराळ भागात संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा

मोदी सरकार १२५ दिवसांची रोजगार गॅरेंटी देणारी योजना आणणार

दिल्ली : केंद्र सरकार मनरेगाच्या जागी नवीन रोजगार योजना आणण्याच्या तयारीत आहे. नरेंद्र मोदी सरकार महात्मा गांधी

देवाला एक मिनीटही विश्रांती घेऊ देत नाहीत...

'पैसेवाल्यांसाठी देवतेला जास्त त्रास' वृंदावनच्या बांके बिहारी मंदिर व्यवस्थापनावर सर्वोच्च न्यायालयाचा

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी