आनंदाची बातमी, व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त

नवी दिल्ली : देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच एक आनंदाची बातमी आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सात रुपयांची कपात झाली आहे. यामुळे १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर जो राजधानी दिल्लीत १८०४ रुपयांत उपलब्ध होता तो आता १७९७ रुपयांत मिळेल. किमतीतील कपातीमुळे १९ किलोचा एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांचा एलपीजीवरील खर्चात कमी होण्यास मदत होणार आहे.



जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या दरातले बदल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी यांच्याआधारे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी, एलपीजी यांचे दर निश्चित होत असतात. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज सकाळी तेल कंपन्या जाहीर करतात. तर सीएनजी, पीएनजी यांच्या दरात अधूनमधून बदल होतात. हे बदल संबंधित कंपन्यांकडून जाहीर केले जातात. एलपीजीचा दर साधारणपणे दर महिन्याच्या एक तारखेला जाहीर केला जातो. या व्यवस्थेनुसार कंपन्यांनी शनिवार १ फेब्रुवारी रोजी दरांबाबत घोषणा केली. कंपन्यांच्या घोषणेनुसार आता व्यावसायिक सिलिंडर सात रुपयांनी स्वस्त झाला आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ६२ रुपयांची वाढ केली होती.

स्थानिक कर आणि वाहतूक खर्च यामुळे कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरात राज्यानुसार बदल होतात. एलपीजीच्या किमती राज्यानुसार बदलतात. हा बदल किरकोळ असला तरी कमी झालेल्या दरांमुळे देशभरातली एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना फायदा होईल.

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी सेवा महागली

मुंबईत शनिवार १ फेब्रुवारी २०२५ पासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा महाग झाली आहे. आधी संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात अर्थात एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २३ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे २८ होते. आता एमएमआरमध्ये किमान रिक्षा भाडे २६ रुपये आणि किमान टॅक्सी भाडे ३१ रुपये झाले आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात प्रत्येकी तीन रुपयांची वाढ झाली आहे.
Comments
Add Comment

Shashi Tharoor : 'आमच्यात सर्वकाही अलबेल',राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना भेटल्यानंतर शशी थरूर यांचं विधान

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी

Supreme Court On UGC: सर्वोच्च न्यायालयाकडून यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या  म्हणजेच यूजीसीच्या नवीन नियमांना स्थगिती देण्यात आली

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर