Patna Crime : ७० वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून सामूहिक अत्याचार आणि मग शीर धडापासून केलं वेगळं; मन हेलावणारी घटना

पाटणा : एका महिलेचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आणि येवढ्यावरच न थांबता नराधमाने महिलेची हत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बिहारमधील बांका जिल्ह्यात ही घटना घडली. ७० वर्षीय निवृत्त ANM ची हत्या करण्यात आली आहे. मृत स्त्रिचा मृतदेह बांका जिल्ह्यातील बेल्हार येथे नदीकाठी आढळून आला.



मिळालेल्या माहितीनुसार, सुलतानगंजहून जमुईला जात असताना ७० वर्षीय वृद्ध महिलेला तिच्याच नातेवाईकांपैकी एकाने साथीदारांच्या मदतीने अपहरण करून सामूहिक अत्याचार केले. त्यानंतर ANM ची हत्या करण्यात आली. ओळख लपवण्यासाठी शीर धडापासून वेगळे केले. आणि नंतर नदीत फेकून दिले. तिच्या शोधासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत होते. दरम्यान, गुरुवारी सकाळी बांका जिल्ह्यातील बेल्हार येथे नदीच्या काठावर महिलेचा शिरच्छेद केलेला मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी बेल्हार पोलीस ठाणे हद्दीतील बडुआ नदीच्या कुमरेल घाटाजवळ एका महिलेचा मृतदेह जमिनीत गाडला होता. पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक आणि श्वान पथकाच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढला, तेव्हा तिची ओळख निवृत्त एएनएम म्हणून झाली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे शीर अद्याप सापडलेले नसून त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या साथीदारांची चौकशी केली.

Comments
Add Comment

सावित्री जिंदाल देशातील सर्वात श्रीमंत महिला; फोर्ब्स इंडियाची यादी जाहीर

नवी दिल्ली : हरियाणा हिसारच्या आमदार आणि ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल या फोर्ब्स इंडियाच्या २०२५

बिहारसाठी ‘एनडीए’चे जागावाटप

विधानसभेच्या २४३ जागांमध्ये १०१ जेडीयू , १०० भाजप , २९ लोजप (आर), ७ हिंदुस्तानी अवामी मोर्चा आणि ६ राष्ट्रीय लोक

कैद्यांना तुरुंगात मतदानाचा हक्क मिळणार?

केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस नवी दिल्ली : तुरुंगात असलेल्या विचाराधीन

फटाक्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली : २० ऑक्टोबर रोजी भारत आणि जगभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर

पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेमुळे शेतकऱ्यांना विशेष फायदा

मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती मुंबई : पंतप्रधान धन धान्य कृषी योजना, राष्ट्रीय डाळी अभियान तसेच कृषी

आंध्र प्रदेशात उभारणार आशियातील सर्वात मोठा डेटा सेंटर; ‘गुगल’ ची १० अब्ज डॉलर्सची मेगा गुंतवणूक

विशाखापट्टणम : टेक कंपनी गूगल भारताच्या डिजिटल क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनी