सिडनी कसोटीत पहिल्याच दिवशी ११ बळी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला आहे तर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा दोन धावा करून कर्णधार जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला आहे. ऑस्ट्रेलियाने दिवस संपेपर्यंत एक बाद नऊ धावा एवढी मजल मारली. अद्याप ऑस्ट्रेलिया १७६ धावांनी पिछाडीवर आहे.



रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या चार पैकी तीन कसोटी सामन्यांतील पाच डावात फलंदाजी केली आणि फक्त ३१ धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला. सिडनी कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड केली. कर्णधार बदलला तरी भारताच्या कामगिरी अद्याप सुधारणा झालेली नाही. भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. यशस्वी जयस्वाल १०, केएल राहुल ४, शुभमन गिल २०, विराट कोहली १७, रविंद्र जडेजा २६, वॉशिंग्टन सुंदर १४, प्रसिद्ध क्रिष्णा ३, जसप्रीत बुमराह २२ करून बाद झाले. नितीश रेड्डी शून्य धावा करून परतला. मोहम्मद सिराज ३ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक चार तर मिचेल स्टार्कने तीन, कर्णधार पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. नॅथन लियॉनने एक बळी घेतला.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना भारताने तर दुसरा आणि चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. अॅडलेड येथे झालेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - १ अशी आघाडी आहे. आता सिडनीत पाचवी आणि निर्णायक कसोटी सुरू आहे. ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतापुढे आहे.
Comments
Add Comment

U19 World Cup : बीसीसीआयकडून ७.५ कोटींच्या बक्षीसाची घोषणा

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १६ व्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात ऐतिहासिक सहावे जेतेपद पटकावणाऱ्या

पाकिस्तानचा नेदरलँडवर निसटता विजय, फहीम अश्रफ ठरला तारणहार

कोलंबो   : टी-२० विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात फहीम अश्रफच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस