सिडनी कसोटीत पहिल्याच दिवशी ११ बळी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला आहे तर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा दोन धावा करून कर्णधार जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला आहे. ऑस्ट्रेलियाने दिवस संपेपर्यंत एक बाद नऊ धावा एवढी मजल मारली. अद्याप ऑस्ट्रेलिया १७६ धावांनी पिछाडीवर आहे.



रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या चार पैकी तीन कसोटी सामन्यांतील पाच डावात फलंदाजी केली आणि फक्त ३१ धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला. सिडनी कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड केली. कर्णधार बदलला तरी भारताच्या कामगिरी अद्याप सुधारणा झालेली नाही. भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. यशस्वी जयस्वाल १०, केएल राहुल ४, शुभमन गिल २०, विराट कोहली १७, रविंद्र जडेजा २६, वॉशिंग्टन सुंदर १४, प्रसिद्ध क्रिष्णा ३, जसप्रीत बुमराह २२ करून बाद झाले. नितीश रेड्डी शून्य धावा करून परतला. मोहम्मद सिराज ३ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक चार तर मिचेल स्टार्कने तीन, कर्णधार पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. नॅथन लियॉनने एक बळी घेतला.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना भारताने तर दुसरा आणि चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. अॅडलेड येथे झालेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - १ अशी आघाडी आहे. आता सिडनीत पाचवी आणि निर्णायक कसोटी सुरू आहे. ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतापुढे आहे.
Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव