सिडनी कसोटीत पहिल्याच दिवशी ११ बळी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसअखेर भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला आहे तर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा दोन धावा करून कर्णधार जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर केएल राहुलकडे झेल देऊन परतला आहे. ऑस्ट्रेलियाने दिवस संपेपर्यंत एक बाद नऊ धावा एवढी मजल मारली. अद्याप ऑस्ट्रेलिया १७६ धावांनी पिछाडीवर आहे.



रोहित शर्माने बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या चार पैकी तीन कसोटी सामन्यांतील पाच डावात फलंदाजी केली आणि फक्त ३१ धावा केल्या. या निराशाजनक कामगिरीमुळे संघ व्यवस्थापनाने कर्णधार रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला. सिडनी कसोटीसाठी संघ व्यवस्थापनाने जसप्रीत बुमराहची कर्णधार म्हणून निवड केली. कर्णधार बदलला तरी भारताच्या कामगिरी अद्याप सुधारणा झालेली नाही. भारताचा पहिला डाव १८५ धावांत आटोपला. भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने सर्वाधिक ४० धावा केल्या. यशस्वी जयस्वाल १०, केएल राहुल ४, शुभमन गिल २०, विराट कोहली १७, रविंद्र जडेजा २६, वॉशिंग्टन सुंदर १४, प्रसिद्ध क्रिष्णा ३, जसप्रीत बुमराह २२ करून बाद झाले. नितीश रेड्डी शून्य धावा करून परतला. मोहम्मद सिराज ३ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने सर्वाधिक चार तर मिचेल स्टार्कने तीन, कर्णधार पॅट कमिन्सने दोन बळी घेतले. नॅथन लियॉनने एक बळी घेतला.



बॉर्डर - गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना भारताने तर दुसरा आणि चौथा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. अॅडलेड येथे झालेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिली होती. यामुळे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे २ - १ अशी आघाडी आहे. आता सिडनीत पाचवी आणि निर्णायक कसोटी सुरू आहे. ही कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतापुढे आहे.
Comments
Add Comment

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय