Ind vs Aus 3rd Test : गाबाच्या मैदानात टीम इंडियाला जिंकण्यासाठी २७५ धावांचं आव्हान

कॅनबेरा : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. आणि अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.या अअखेरच्या दिवशी भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ बाकी आहे.



भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील १८५ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या ८९ धावांसह यजमान संघानं २७४ धावांची आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने संघाचे टार्गेट सेट करण्याचे इरादे स्पष्ट करणारी खेळी केली. १० चेंडूत त्याने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. ही ऑस्ट्रेलियन संघाकडून दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय एलेक्स कॅरीनं २० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅविस हेडनं १९ चेंडूत १७ धावांचं योगदान दिले.आघाडीच्या पाच फलंदाजांना दुहेरी आक़डाही गाठता आला नाही. ट्रॅविस हेडनं दुहेरी आकडा पार केला. पण तो यावेळी टीम इंडियासाठी काही डोकेदुखी ठरला नाही.





जसप्रीत बुमराह या मालिकेत पहिल्यापासून कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या डावात ६ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या आणि पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.यांनतर आता भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ उरला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ कोणत्या अप्रोचसह खेळणार ते पाहण्याजोगे असेल.

Comments
Add Comment

तेल आयात सोडा, ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून भारताचा रशियाबरोबर विमान निर्मितीचा ऐतिहासिक करार

देशात तयार होणार सुखोई सुपरजेट नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापारी संबंध ताणले

चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार

पुढील पाच दिवसांत काही राज्यांना पावसाचा इशारा! मुंबई : बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोंथा चक्रीवादळ, अरबी

फॉरेन्सिकचं ज्ञान वापरून खून लपवण्याचा प्रयत्न, पण हुशार पोलिसांनी बिंग फोडले!

नवी दिल्ली : यूपीएससीची तयारी करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाची त्याच्याच प्रेयसीनं हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने