Ind vs Aus 3rd Test : गाबाच्या मैदानात टीम इंडियाला जिंकण्यासाठी २७५ धावांचं आव्हान

कॅनबेरा : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. आणि अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.या अअखेरच्या दिवशी भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ बाकी आहे.



भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील १८५ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या ८९ धावांसह यजमान संघानं २७४ धावांची आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने संघाचे टार्गेट सेट करण्याचे इरादे स्पष्ट करणारी खेळी केली. १० चेंडूत त्याने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. ही ऑस्ट्रेलियन संघाकडून दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय एलेक्स कॅरीनं २० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅविस हेडनं १९ चेंडूत १७ धावांचं योगदान दिले.आघाडीच्या पाच फलंदाजांना दुहेरी आक़डाही गाठता आला नाही. ट्रॅविस हेडनं दुहेरी आकडा पार केला. पण तो यावेळी टीम इंडियासाठी काही डोकेदुखी ठरला नाही.





जसप्रीत बुमराह या मालिकेत पहिल्यापासून कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या डावात ६ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या आणि पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.यांनतर आता भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ उरला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ कोणत्या अप्रोचसह खेळणार ते पाहण्याजोगे असेल.

Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत 'महाराष्ट्र पॅटर्न'चे सर्वोच्च न्यायालयाने केले कौतुक

अन्य राज्यांच्या उपाययोजनांवर ओढले ताशेरे नवी दिल्ली :देशातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांना

भारतीय उद्योगांसाठी युरोपीयन बाजारपेठ

९० टक्के वस्तूंवर शुल्क माफ करारामुळे दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांना बळ नवी दिल्ली : भारत आणि युरोपीयन

भारताला नुकसान पोहोचवणे, हाच पाकिस्तानचा अजेंडा

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानने नेहमीच विनाकारण

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

१ फेब्रुवारीला सादर होणार अर्थसंकल्प गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर

‘मदर ऑफ ऑल डील’वर स्वाक्षरी

भारत व युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार कराराची अधिकृत घोषणा नवी दिल्ली : भारत आणि युरोपियन युनियनमध्ये

Jammu And Kashmir : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बस आणि ट्रकची भीषण धडक; CRPF जवानांसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी काळाने भीषण घाला घातला. उधमपूर जिल्ह्यात एक