Ind vs Aus 3rd Test : गाबाच्या मैदानात टीम इंडियाला जिंकण्यासाठी २७५ धावांचं आव्हान

  49

कॅनबेरा : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. आणि अखेरच्या म्हणजेच पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.या अअखेरच्या दिवशी भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ बाकी आहे.



भारतीय संघाचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्यावर ऑस्ट्रेलियानं आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली. १८ षटकांच्या खेळात ७ बाद ८९ धावा करत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील १८५ धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावात केलेल्या ८९ धावांसह यजमान संघानं २७४ धावांची आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्स याने संघाचे टार्गेट सेट करण्याचे इरादे स्पष्ट करणारी खेळी केली. १० चेंडूत त्याने २ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. ही ऑस्ट्रेलियन संघाकडून दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्याशिवाय एलेक्स कॅरीनं २० चेंडूत २ चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅविस हेडनं १९ चेंडूत १७ धावांचं योगदान दिले.आघाडीच्या पाच फलंदाजांना दुहेरी आक़डाही गाठता आला नाही. ट्रॅविस हेडनं दुहेरी आकडा पार केला. पण तो यावेळी टीम इंडियासाठी काही डोकेदुखी ठरला नाही.





जसप्रीत बुमराह या मालिकेत पहिल्यापासून कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. पहिल्या डावात ६ विकेट्स घेणाऱ्या जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. तिसऱ्या कसोटी सामन्यातील अखेरच्या आणि पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघानं टीम इंडियासमोर २७५ धावांचे टार्गेट सेट केले आहे.यांनतर आता भारतीय संघासाठी जवळपास ५४ षटकांचा खेळ उरला आहे. त्यामुळे आता भारतीय संघ कोणत्या अप्रोचसह खेळणार ते पाहण्याजोगे असेल.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )