Amravati: दर्यापूर बाजार समितीत मिळाला कापसाला ८००० हजारांचा उच्चांकी दर !

  101

अमरावती: कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर कापूस शेतमाल वगळता सर्व शेतमालाचा खुल्या पध्दतीने हर्हास होत असतो त्यामध्ये शेकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळून शेतकरी वर्गाच समाधान बघायला मिळत याच पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस शेतमाल विक्री देखील हर्यास पध्दतीने व्हावी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिका अधिक भाव मिळावा या प्रामाणिक हेतूने बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला व आंतराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधत याच पद्धतीचा शुभारंभ मा. खासदार बळवंत भाऊ वानखडे व मा. सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या मार्गदर्शनात तसेच ऍड श्रीरंग पाटील अरबट यांच्या हस्ते आज रोजी झाला.



बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी शेतकरी वर्गाला केलेल्या आव्हाहणाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत आज बाजार समिती यार्डवर आपल्या कापूस गाड्या आणून बाजार समितीला सहकार्य केले. सर्वप्रथम कापूस गाड्या ह्या बाजार समिती यार्डवर आणून त्याची नोंद करून टोकन वाटप करून बाजार समितीच्या वतीने कापूस विक्री करिता आणलेल्या सर्व शेतकरी बंधूंचा शाल व श्रीफळ , रोप देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी वर्गाचा देखील सत्कार करण्यात आला. कापूस हर्यास झाल्यानंतर बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरिता पाठवण्यात आल्या. यावेळी कापसाला रुपये ८००० हजार उचाकी भाव मिळाला तर सरासरी ७४५० ते ७५२१ पर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला यावेळी शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

महादेवी हत्तिणीला ‘वनतारा’मध्ये पाठवण्याबाबतचा अहवाल

पेटा संस्थेमार्फत सत्यपरिस्थिती नमूद कोल्हापूर : महादेवी या हत्तिणीला कोल्हापूर मधील एका मठातून वनतारा येथे

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपी ताब्यात

नागपूर:  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निर्मानाधीन निवासस्थान बॉम्बने उडवण्याची