Amravati: दर्यापूर बाजार समितीत मिळाला कापसाला ८००० हजारांचा उच्चांकी दर !

अमरावती: कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर कापूस शेतमाल वगळता सर्व शेतमालाचा खुल्या पध्दतीने हर्हास होत असतो त्यामध्ये शेकऱ्यांच्या शेतमालाला अधिक भाव मिळून शेतकरी वर्गाच समाधान बघायला मिळत याच पद्धतीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस शेतमाल विक्री देखील हर्यास पध्दतीने व्हावी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अधिका अधिक भाव मिळावा या प्रामाणिक हेतूने बाजार समिती संचालक मंडळाने निर्णय घेतला व आंतराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधत याच पद्धतीचा शुभारंभ मा. खासदार बळवंत भाऊ वानखडे व मा. सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या मार्गदर्शनात तसेच ऍड श्रीरंग पाटील अरबट यांच्या हस्ते आज रोजी झाला.



बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील गावंडे यांनी शेतकरी वर्गाला केलेल्या आव्हाहणाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत आज बाजार समिती यार्डवर आपल्या कापूस गाड्या आणून बाजार समितीला सहकार्य केले. सर्वप्रथम कापूस गाड्या ह्या बाजार समिती यार्डवर आणून त्याची नोंद करून टोकन वाटप करून बाजार समितीच्या वतीने कापूस विक्री करिता आणलेल्या सर्व शेतकरी बंधूंचा शाल व श्रीफळ , रोप देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी वर्गाचा देखील सत्कार करण्यात आला. कापूस हर्यास झाल्यानंतर बाजार समितीची सौदापट्टी घेऊन गाड्या जिनिंगवर मोजमापाकरिता पाठवण्यात आल्या. यावेळी कापसाला रुपये ८००० हजार उचाकी भाव मिळाला तर सरासरी ७४५० ते ७५२१ पर्यंत भाव खुल्या बाजारात मिळाला यावेळी शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये