Nagpur: नागपूर मध्ये शालेय सहल घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात;अपघातात एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर: नागपुरात विद्यार्थांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज, मंगळवारी सकाळी 9 वाजता घडली. नागपूर-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. अपघातग्रस्त बसमध्ये नागपूर इथल्या सरस्वती शाळेतील विद्यार्थी होते. या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.



यासंदर्भातील माहितीनुसार नागपुरातील शंकरनगर परिसरातील सरस्वती शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल आज, मंगळवारी वर्धा जिल्ह्यातील बोरधरण इथे जात होती. एकूण 5 बसेस शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेऊन चालल्या होत्या. त्यापैकी 4 बस सुखरूप पुढे गेल्या परंतु, शेवटी असलेल्या बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून पेंढरी गावाजवळ हा अपघात झाला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ मिहान परिसरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.
Comments
Add Comment

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक

JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व

Pratap Sarnaik : एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे ५८ टक्के महागाई भत्ता

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; घरभाडे भत्ताही वाढवणार मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच

Uri Blast : 'उरी'मध्ये शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये (Uri Blast) नियंत्रण रेषेजवळ कर्तव्य बजावत असताना

Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची गाडी अडकली! राज्यात उकाड्याचा कहर कायम; ‘या’ कारणामुळे पाऊस पुढे सरकेना

मुंबई : महाराष्ट्रात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सध्या मंदावली असून राज्यातील