Ajit Pawar : थोडक्यात वाचलास..., अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

प्रीतीसंगमावर पुतण्याने काकांना केला वाकून नमस्कार


सातारा : यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रीतीसंगमावर अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. अशातच आज पवारांच्या तीन पिढ्या शरद पवार, (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) आणि रोहित पवार (Rohit Pawar) प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होत्या. यावेळी प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार काही वेळासाठी आमने-सामने आले. त्यावेळी काका अजित पवारांना पुतण्या रोहित पवारांनी वाकून नमस्कार केला. अजित पवारांनी रोहित पवारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, ऑल द बेस्टही म्हटले.


रोहित पवार समोर आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना हस्तांदोलन केले आणि त्यांना काकांच्या पाया पड, असे म्हणत खाली वाकून नमस्कार करण्यासाठी आग्रह केला. रोहित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता, अजित पवारांना खाली वाकून नमस्कार केला. त्यानंतर रोहित पवारांना निवडून आल्याबद्दल अजित पवारांनी अभिनंदन केले आणि दाद्या, थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर, काय झालं असतं विचार कर... असा टोलाही अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला.


?si=MFpaMPROh6lCT9WR

या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) माझे काका आहेत, म्हणून मी पाया पडलो. शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणे माझी जबाबदारी आहे. माझी सभा झाली असती, तर अडचण झाली असती.. असं विधान देखील अजित पवारांनी केलं. यावर रोहित पवारांना विचारले असता नक्कीच अजित पवारांची सभा झाली असती तर वर-खाली झालं असतं, उलटंही होऊ शकलं असतं. पण ते बारामतीमध्ये अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. शेवटी अजित पवार मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता. त्यांचे आमदार देखील मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. चांगली गोष्ट आहे, मी त्यांचे अभिनंदन देखील केले, असे रोहित पवार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना