Vinod Tawde: भाजपा नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा ठाकूरांचा आरोप; तर तावडेंनी आरोप फेटाळले!

तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार


मुंबई : क्षितीज ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला. मुंबईच्या विरार परिसरातील हॉटेल विवांतामध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी तावडेंना घेराव घातला. याप्रकरणी बविआने तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान तावडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज तपासून निष्पक्ष चौकशीची मागणी केलीय.


बहुजून विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार आज मंगळवारी विनोद तावडेही विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत होते. तब्बल ५ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोप बविआने केला आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.



या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकूर म्हणालेत की, विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन त्याचे वाटप करत होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना २ डायऱ्या सापडल्या आहेत. आता प्रचार संपला आहे. त्यानंतर देखील विनोद तावडे हे मतदार संघात कसे आहेत? मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे त्यांना माहीत नाही का? असे प्रश्न देखील ठाकूर यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, पराभव पुढे दिसत असल्याने असे आरोप विरोधक करत असल्याचा आरोप भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती