Vinod Tawde: भाजपा नेते विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा ठाकूरांचा आरोप; तर तावडेंनी आरोप फेटाळले!

तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार


मुंबई : क्षितीज ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला. मुंबईच्या विरार परिसरातील हॉटेल विवांतामध्ये बविआच्या कार्यकर्त्यांनी आज, मंगळवारी तावडेंना घेराव घातला. याप्रकरणी बविआने तावडेंच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. दरम्यान तावडेंनी हे सर्व आरोप फेटाळून लावत सीसीटीव्ही फुटेज तपासून निष्पक्ष चौकशीची मागणी केलीय.


बहुजून विकास आघाडीने केलेल्या आरोपानुसार आज मंगळवारी विनोद तावडेही विरार येथील मनोरीपाडा येथील हॉटेल विवांत येथे आले होते. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे उमेदवार राजन नाईक व काही पदाधिकारी होते. त्यांच्यात बैठक सुरू असतांना बहुजन विकास आघाडीचे काही कार्यकर्ते ही थेट या हॉटेलमध्ये घुसले. यावेळी तावडे हे पैसे वाटत होते. तब्बल ५ कोटी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोप बविआने केला आहे. दरम्यान, या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी रोखले. यामुळे दोन्ही गटात तुफान राडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.



या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले. ठाकूर म्हणालेत की, विनोद तावडे हे विवांता हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये घेऊन त्याचे वाटप करत होते. पोलीस हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना २ डायऱ्या सापडल्या आहेत. आता प्रचार संपला आहे. त्यानंतर देखील विनोद तावडे हे मतदार संघात कसे आहेत? मतदानाच्या ४८ तास आधी बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे असतात, हे त्यांना माहीत नाही का? असे प्रश्न देखील ठाकूर यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान, पराभव पुढे दिसत असल्याने असे आरोप विरोधक करत असल्याचा आरोप भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.

Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील