पैसे वाटपावरून ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; पालघरमध्ये तणाव

पालघर : राज्यातील थंड हवामानातही पालघरच्या राजकीय वातावरणाने तापमान वाढवले आहे. पैसे वाटपावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या प्रकरणामुळे विष्णूनगर भागात तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


विष्णूनगर भागातील वर्धमान सोसायटीमध्ये शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील वेळ संपून गेल्यानंतरही प्रचारासाठी गेले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, प्रचाराच्या नावाखाली पैसे वाटप करण्यात येत होते. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला. काही वेळातच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले आणि शाब्दिक बाचाबाची झाली.



प्रसंगाची माहिती मिळताच पालघर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती शांत करत संशयित कार ताब्यात घेतली. मात्र, तपासणीत कारमध्ये पैसे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळले नाहीत. पोलिसांनी दोन्ही गटांना समज दिली आणि तणाव निवळला.


प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, अधिकृत तक्रारींचा तपास सुरू आहे. या घटनेने निवडणुकीनंतरही राजकीय संघर्ष कसा चिघळतो आहे, हे स्पष्ट झाले आहे.


पालघरमधील या घटनेने ठाकरे व शिंदे गटातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हे प्रकरण भलेही थांबले असले तरी या राजकीय संघर्षाचा परिणाम स्थानिक वातावरणावर होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत