मिर्झापूर : उत्तरप्रदेशच्या (Uttarpradesh) मिर्झापूर जिल्ह्यातून भीषण अपघात (Accident News) झाल्याची बातमी समोर आली आहे. काल रात्री उशिरा जीटी रोडवरील कटका गावाजवळ ट्रकच्या धडकेत १० जणांचा मृत्यू झाला. या ट्रकने भदोही जिल्ह्यातून बनारसला जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागून धडक दिली. जोरदार झालेल्या धडकेमुळे या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १ वाजेच्या सुमारास मिर्झा मुराद कांचवा सीमेवर रस्ता अपघात झाल्याची माहिती मिळाली. भदोही जिल्ह्यातून १३ जणांना घेऊन बनारसला जात असलेल्या ट्रॅक्टरला एका अनियंत्रित ट्रकने मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये ट्रॅक्टरमधील १३ जणांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.