सेबीकडून अनिल अंबानींच्या मुलाला एक कोटींचा दंड!

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांचा मुलगा अनमोल (Anmol Ambani) याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. शेअर बाजार नियमनाशी संबंधित सेबीने ही कारवाई केली आहे. या सोबतच रिलायन्स हाऊसिंग फायनान्सचे मुख्य अधिकारी कृष्णन गोपालकृष्णन यांना देखील सेबीने १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दोघांनाही ४५ दिवसांच्या आत दंड भरावा लागेल, असे सेबीने आपल्या आदेशात म्हटलं आहे.


भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने (सेबी) सोमवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, त्यांनी रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडच्या बाबतीत चालू तपास पूर्ण केला आहे. त्या तपासात असं आढळून आलं आहे की, ज्या लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांनी सेबीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. रिलायन्स होम फायनान्सच्या संचालक मंडळावर असलेल्या अनमोल अंबानी यांनी कॉर्पोरेट कर्ज किंवा जीपीसीएल कर्ज मंजूर केले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने स्पष्टपणे निर्देश दिले होते की, अशा कर्जाची मंजुरी दिली जाणार नाही तरीही कर्ज देण्यात आलं आहे. २०१८-१९ मध्ये रिलायन्स होम फायनान्सच्या निधी वळवण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर, सेबीने तपास केला आणि असे दिसून आले की अनिल अंबानी हे या फसवणूक योजनेचे मास्टरमाईंड होते, ज्यामुळे भागधारकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं.


अनमोल अंबानी यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी Acura प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडला २० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलं, तर संचालक मंडळाने ११ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाला आणखी कर्ज न देण्याचे निर्देश दिले होते. आपल्या आदेशात, सेबीने अनिल अंबानी आणि रिलायन्स होम फायनान्सच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतर २४ लोकांना सिक्युरिटीज मार्केटमधून पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

Comments
Add Comment

‘एमयुएचएस’ च्‍या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक : राज्‍य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्‍ती ‘महाराष्‍ट्र

“मोदी मिशन हे पुस्तक पुढच्या पिढीला प्रेरणा देणारं”, 'मोदीज् मिशन' मधील काही भाग पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना

मुंबई :“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे आणि संग्रहित

मुंबईनजिक बांधणार देशातील सर्वाधिक लांबीची भिंत! पण यामागचे कारण काय?

मुंबई : पालघर जिल्ह्यात बांधले जाणारे वाढवण बंदर हा केंद्र सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. या बंदरात

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

पुण्याच्या NDA मध्ये गूढ! एकाच आठवड्यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू: नेमकं चाललंय तरी काय?

पुणे : पुण्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (NDA) पोहण्याचा सराव करत

मुंबई पोलिसांचा दाऊदच्या टोळीला मोठा झटका! ड्रग्सचा कारखाना सांगलीत तर मास्टरमाइंड दुबईतून पकडला

मुंबई : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने (गुन्हे शाखेने) एक मोठे ड्रग्सचे आंतरराष्ट्रीय जाळे पकडून दाऊद