Mumbai-Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा!

मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) काही तास उरले असताना बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) वाहनांच्या मोठ्या रांगा (Traffic Jam) लागल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या आणखी डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या महामार्गावर वाहनांच्या ६ ते ७ किमीपर्यंत रांगा लागल्या असून साधारण एक ते दिड तासापर्यंत वाहने जागीच ठप्प असल्याची माहिती मिळाली.


दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले असून, पोलीस यंत्रणेकडून ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसे आणखी चाकरमानी गावाची वाट धरतीलही, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय