ST Strike : संप करु नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाची घोषणा झाल्याने चाकरमान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, एसटी ही गावोगावी पोहोचणारी महत्त्वाची सेवा आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक नागरिक खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे संप टाळा आणि चर्चेतून तोडगा काढू.


एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता, आणि इतर वित्तीय मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांसाठी ४८४९ कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होईल असे आश्वासन दिले आहे आणि आजच्या बैठकीत तातडीचा तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे