ST Strike : संप करु नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर संपाची घोषणा झाल्याने चाकरमान्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (४ सप्टेंबर) सायंकाळी ७ वाजता सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावली आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना संप स्थगित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, एसटी ही गावोगावी पोहोचणारी महत्त्वाची सेवा आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक नागरिक खरेदीसाठी आणि इतर कामांसाठी एसटीवर अवलंबून असतात. त्यामुळे संप टाळा आणि चर्चेतून तोडगा काढू.


एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, प्रलंबित महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता, आणि इतर वित्तीय मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या मागण्यांसाठी ४८४९ कोटी रुपयांच्या शिल्लक रकमेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा होईल असे आश्वासन दिले आहे आणि आजच्या बैठकीत तातडीचा तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद