Beed Loksabha : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात

मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना घडला हा प्रकार


बीड : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) निकाल काल जाहीर झाले आणि बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांचा विजय झाला. बजरंग सोनावणे व भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पॅटर्नमुळे भाजपाला मराठवाड्यात काहीसा धक्का मिळाल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे अखेर बजरंग सोनावणे यांनी विजय पक्का केला. त्यानंतर ते मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.


बीडमध्ये निवडणूक अधिकारींकडून विजयाचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी लोकांसोबत जल्लोषामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ते मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले. त्याचवेळी बजरंग सोनवणेंच्या ताफ्यातील एक गाडी त्यांच्या गाडीला धडकली. या अपघातात काही जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर रात्री उशीरा झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनावणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे जात असताना शहागड पुलाच्या बाजूला ताफ्यातील एक कार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला येऊन धडकली. ताफ्यातील गाडी धडकल्याने बजरंग सोनवणे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. मात्र तिथून अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे सोनवणे यांनी भेट घेतली.

Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय