Beed Loksabha : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्या गाडीला अपघात

  221

मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना घडला हा प्रकार


बीड : लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) निकाल काल जाहीर झाले आणि बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांचा विजय झाला. बजरंग सोनावणे व भाजपाच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मात्र, मराठा आंदोलन आणि मनोज जरांगे पॅटर्नमुळे भाजपाला मराठवाड्यात काहीसा धक्का मिळाल्याच्या चर्चा आहेत, त्यामुळे अखेर बजरंग सोनावणे यांनी विजय पक्का केला. त्यानंतर ते मनोज जरांगे यांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.


बीडमध्ये निवडणूक अधिकारींकडून विजयाचे सर्टिफिकेट घेतल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी लोकांसोबत जल्लोषामध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ते मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले. त्याचवेळी बजरंग सोनवणेंच्या ताफ्यातील एक गाडी त्यांच्या गाडीला धडकली. या अपघातात काही जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. रात्री अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात जालना जिल्ह्यातील धुळे- सोलापूर महामार्गावर रात्री उशीरा झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री सोनावणे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे जात असताना शहागड पुलाच्या बाजूला ताफ्यातील एक कार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला येऊन धडकली. ताफ्यातील गाडी धडकल्याने बजरंग सोनवणे यांच्या गाडीला किरकोळ अपघात झाला. मात्र तिथून अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे सोनवणे यांनी भेट घेतली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या